शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

'हे' किल्ले भाडेतत्वावर दिले जाणार; पर्यटन मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 16:52 IST

'महाराष्ट्रात तीन प्रकारचे किल्ले आहेत.'

मुंबई : राज्यातील 25 किल्ले लग्नसमारंभ आणि हॉटेलसाठी भाड्याने देऊन पर्यटनाला चालना देणार असल्याचे वृत्त आल्यानंतर राज्य सरकारकडून सारवासारव करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात पर्यटनमंत्रीजयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण दिले असून जे किल्ले पर्यटन आणि महसूल विभागाकडे असून दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी एक पॉलिसी आखण्याचे काम सुरु असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात तीन प्रकारचे किल्ले आहेत. एक शिवाजी महाराजांचे किल्ले, दुसरे ऐतिहासिक व महत्वाचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) ताब्यात किल्ले आहेत. याव्यतिरिक्त तिसरे म्हणजे गावोगावी असलेले किल्ले, महसूल विभागाच्या ताब्यात असलेले किल्ले, जे कोणाच्याही ताब्यात नाहीत, अशा किल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी पर्यटन विभागाकडून एक पॉलिसी आखण्याचे काम सरु असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले. 

जे किल्ले दुर्लक्षित आहेत. ज्या किल्ल्यांना सुरक्षारक्षक सुद्धा नाही, अशा किल्ल्यांचा विकास करणे. त्या ठिकाणी लाईट्स, साऊंड शो, मुझ्यियम, न्याहरी-निवासाची सोय करता येईल. ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. भारतातील प्रत्येक राज्याने अशी एक पॉलिसी बनविली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा या सर्व राज्यात ही पॉलिसी आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात इतके किल्ले असताना मागील सरकारने अशी पॉलिसी बनविली नाही, असे असे जयकुमार रावल म्हणाले. 

पर्यटनाला चालना देण्यासाठी शिवाजी महाराजांचे किल्ले आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ताब्यात असलेले किल्ले सोडून, जे पर्यटन आणि महसूल विभागाच्या ताब्यात आहेत. म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती किल्ला, अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंबा किल्ला, नागपूरमधील नगरधन, मराठवाड्यातील नळदुर्ग किल्ला अशा दुर्लक्षित किल्ल्यांना दत्तक देऊन या किल्ल्याची दुरूस्ती आणि देखभाल झाली पाहिजे, यासाठी पर्यटन आराखडा तयार केला जात असल्याचेही जयकुमार रावल यांनी सांगितले.

याशिवाय, यावरुन निराधार विधानं करुन चुकीची माहिती देऊन अफवा पसरविली जात आहे. या माध्यमातून भावना भडकतात. त्यामुळे माहिती घेऊन जबाबदारीने विधान करावे, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातील यशवंतगड, कंधार, नळदुर्ग, कोरीगड, घोडबंदर, पारोळा, सलहेर, नगरधन आणि लळिंग या किल्ल्यांची  देखभाल करण्यासाठी भाडेतत्वावर दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :FortगडJaykumar Rawalजयकुमार रावलtourismपर्यटन