शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

अशी आहेत नव्या मंत्र्यांची संभाव्य खाती, देवेंद्र फडणवीसांवर २ खात्याची जबाबदारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:05 IST

आज शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे

मुंबई - मागील महिन्यापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा आज पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये पहिल्या टप्प्यात १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली. या मंत्रिमंडळातील नावावरून वाद पाहायला मिळाला. संजय राठोड यांना मंत्री बनवल्याने भाजपाच्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. 

मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुणाला कुठलं खाते मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात नव्या मंत्र्यांनी मिळणारी संभाव्य खात्यांचे नाव समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर २ महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. त्यात गृह आणि अर्थ खाते हे फडणवीसांकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे. आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. 

संभाव्य खातेवाटप

  • एकनाथ शिंदे - नगरविकास खाते
  • देवेंद्र फडणवीस - गृह आणि अर्थ
  • राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, सहकार खाते
  • चंद्रकांत पाटील - सार्वजनिक बांधकाम
  • गिरीश महाजन - जलसंपदा खाते
  • सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वने खाते
  • विजयकुमार गावित - आदिवासी विकास खाते
  • उदय सामंत - उद्योग खाते
  • अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक विकास
  • दीपक केसरकर - पर्यटन, पर्यावरण
  • रवींद्र चव्हाण - गृहनिर्माण
  • सुरेश खाडे - सामाजिक न्याय विभाग
  • मंगलप्रभात लोढा - विधी व न्याय विभाग
  • गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा
  • दादा भुसे - कृषी खाते
  • अतुल सावे - आरोग्य खाते
  • तानाजी सावंत - उच्च व तंत्र शिक्षण खाते

 

अधिवेशनानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तारआज शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यातच, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी स्वतःच यावर भाष्य करत, "प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले. तेसे मलाही वाटतेना. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे. आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, आपण नाराज नाही," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. 

मंत्रिपद आमचा हक्क, अधिकार - कडूभाजपा-शिवसेनेसोबत सरकारमध्ये अपक्ष, मित्रपक्षांनीही साथ दिली. मात्र पहिल्या विस्तारात अपक्षांना संधी देण्यात आली नाही. त्याबद्दल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. दिव्यांग कल्याण मंत्रालय, रोजगार हमी विभाग यासाठी आम्ही आग्रही आहोत. मंत्रिपदाचा आमचा हक्क, अधिकार आहे ते आम्ही मिळवू. सामान्य माणसांचे विषय मार्गी लागावेत याला प्राधान्य आहे. मित्रपक्ष, अपक्षांशिवाय सरकार राहू शकत नाही. राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते. आम्हाला शब्द दिला आहे. आता काही पावलं मागे घेतली आहे. शब्दाला ठाम राहावं अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस