शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न वारंवार झाला; भास्कर जाधवांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 12:22 IST

भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रत्नागिरी - भारतीय जनता पार्टीने राज्यात वेगवेगळे विषय उभे करून दंगल घडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. कधी कंगना रणौत, सुशांत सिंग राजपूत तर कधी नुपूर शर्मा, काही जणांच्या हाती भोंगा दिला आणि एकाकडे हनुमान चालीसा दिली. नानातऱ्हेने महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री सर्वजाती धर्माचे लाडके होतायेत त्यासाठी भाजपा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. 

भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जाधवांनी भाजपावर हल्लाबोल केला. भास्कर जाधव म्हणाले की, आज मुंबईत सगळीकडे बॅनर्स लागले आहेत. आपले सरकार आले आणि हिंदुचे सणांवरील विघ्न टळले. बेस्ट बस, बसस्टॉपवर आहे. यंदाचा शिमगा, गुढीपाडवा, ईद हे सगळे सण विनाअडथळा सुरू करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले असा टोला जाधवांनी शिंदे-भाजपा सरकारला लगावला. 

बंडखोर आमदार विश्वासघातकी४० आमदारांनी शिवसेनेशी विश्वासघात केला हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही. उद्धव ठाकरेंसारख्या सोज्वल माणसाला ज्यांना राजकारण जमलं नाही त्यांना विश्वासघाताने राजगादीवरून खाली खेचण्यात आले. या अनंत वेदना सगळ्या जातीधर्मातील लोकांमध्ये आहे. शिवसेना आणखी वाढणार आहे. पण तिला योग्य प्रकारे आकार, दिशा देणे, आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे माझं काम असेल असं भास्कर जाधवांनी म्हटलं.

रामदास कदम बेईमान रामदास कदम आहेत कोण? त्यांचा संबंध काय? रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही. ज्याप्रकारे रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल जी भाषा वापरत आहेत. टीका करत आहेत. ते कदम इतके कृतघ्न असतील वाटलं नव्हतं. याच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दसरा मेळावा झाला तेव्हा तुम्ही नेते म्हणून भाषण केले. आज त्याच उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेऊ नये म्हणणं म्हणजे तुम्ही किती उलट्या काळजाचे आहात. तुम्ही किती बेईमान आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे असा घणाघात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला.  

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना