शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरवणकरांनी फायरिंग केलेली, पोलिसांचा रिपोर्टही होता, मग कारवाई का नाही? विनायक राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:16 IST

सत्तेचा माज आलेले मिंध्ये सरकार पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात ...

सत्तेचा माज आलेले मिंध्ये सरकार पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात तसे त्यांना पकडले आहे. सुर्वे आणि सरवणकर यांच्या कृत्यावर का कारवाई नाही झाली? सरवणकर यांनीच फायरिंग केल्याचा रिपोर्ट पोलिसांनी दिला होता, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी विचारला आहे. 

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता तोंडाशी आलेलं पीक गेले. तेलंगणामध्ये जाऊन लोचटगिरी सुरू आहे. दुसरीकडे शेतकरी टाहो फोडतो आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली. 

गद्दार गट भाजपच्या इशाऱ्यावर चालला आहे. अजित पवार आणि शिंदे गट तिथे जाऊन प्रचार करतात. लोकांनी तिथे शिंदे गटाचा धिक्कार केला आहे, असे राऊत म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जयंती निमित्त नाशिकमध्ये महाशिबिर होणार आहे. शेतकरी नोकरदार, महिला अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. यानंतर नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. 23 जानेवारीला या महाशिबिराचे आयोजन केले गेले आहे, असे राऊतांनी सांगितले. 

मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातले मंत्री व्यासपीठावर येऊन विसंवाद निर्माण करतात हे योग्य नाही. मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन शड्डू ठोकणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे होतेय असा संशय आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले. 

भुजबळ यांनी राजीनामा द्यावा असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे. विखे पाटलांचे मला कौतुक वाटते. त्यांनी धारिष्ट्य दाखवले ते मुख्यमंत्री यांनी दाखवायला पाहिजे होते. समाजात भांडण लावले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेArrestअटकsada sarvankarसदा सरवणकर