शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सरवणकरांनी फायरिंग केलेली, पोलिसांचा रिपोर्टही होता, मग कारवाई का नाही? विनायक राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:16 IST

सत्तेचा माज आलेले मिंध्ये सरकार पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात ...

सत्तेचा माज आलेले मिंध्ये सरकार पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात तसे त्यांना पकडले आहे. सुर्वे आणि सरवणकर यांच्या कृत्यावर का कारवाई नाही झाली? सरवणकर यांनीच फायरिंग केल्याचा रिपोर्ट पोलिसांनी दिला होता, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी विचारला आहे. 

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता तोंडाशी आलेलं पीक गेले. तेलंगणामध्ये जाऊन लोचटगिरी सुरू आहे. दुसरीकडे शेतकरी टाहो फोडतो आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली. 

गद्दार गट भाजपच्या इशाऱ्यावर चालला आहे. अजित पवार आणि शिंदे गट तिथे जाऊन प्रचार करतात. लोकांनी तिथे शिंदे गटाचा धिक्कार केला आहे, असे राऊत म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जयंती निमित्त नाशिकमध्ये महाशिबिर होणार आहे. शेतकरी नोकरदार, महिला अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. यानंतर नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. 23 जानेवारीला या महाशिबिराचे आयोजन केले गेले आहे, असे राऊतांनी सांगितले. 

मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातले मंत्री व्यासपीठावर येऊन विसंवाद निर्माण करतात हे योग्य नाही. मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन शड्डू ठोकणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे होतेय असा संशय आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले. 

भुजबळ यांनी राजीनामा द्यावा असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे. विखे पाटलांचे मला कौतुक वाटते. त्यांनी धारिष्ट्य दाखवले ते मुख्यमंत्री यांनी दाखवायला पाहिजे होते. समाजात भांडण लावले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेArrestअटकsada sarvankarसदा सरवणकर