शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

ढगाळ वातावरणाची मुंबईत शक्यता

By admin | Updated: January 26, 2015 04:10 IST

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर आता ओसरल्याने मराठवाडा वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे.

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर आता ओसरल्याने मराठवाडा वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे. शिवाय हवामानातील बदलामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, मुंबईत हवामान ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गेल्या आठवडाभरापासून राज्यातील हवामानात बदल नोंदविण्यात येऊ लागले आहेत. राज्यातील थंडीचा जोर काहीसा ओसरला असून, गेल्या सात दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यातील हवामान कोरडे नोंद झाले आहे. दुसरीकडे हवामान खात्यानुसार, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.विशेष म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, कमाल तापमानात मात्र घट नोंदविण्यात येत आहे. किमान तापमान १५ अंशाहून २१ अंशावर पोहोचले असून, कमाल तापमान ३१ अंशाहून २८ अंशावर घसरले आहे. शिवाय दोन दिवसाआड शहरातील वातावरण ढगाळ होत आहे. परिणामी, शहरातील दिवसाच्या वातावरणातील गारवा कमी झाला असून, रात्री वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारवा टिकून आहे. (प्रतिनिधी)