शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
4
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
5
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
6
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
7
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
8
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
9
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
10
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
11
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
12
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
13
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
14
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
15
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
16
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
17
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
19
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
20
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर

देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 12:32 IST

अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

मुंबई: औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच यावेळी त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नसल्याने न्यायाची अपेक्षा करणेच चुकीचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

औरंगाबादेत शुक्रवारी नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एनआरसी लागू करणार नाही असे केंद्र सरकार सांगत आहे. मग महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारण्यासाठी जागा का निश्चित करण्यात आली? दीड ते पाच लाख नागरिक ठेवण्यासाठी हे सेंटर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर मुस्लिम समाज या कायद्यामुळे जागृत झाला. मागासलेले 40 टक्के नागरिक अजूनही जागृत झाले नाहीत. हे हिंदू बांधवही एनआरसीचा शिकार होणार असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

तर याच मुद्यावरून त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही. सरकारच्या तावडीत ही व्यवस्था सापडली आहे. त्यामुळे अशा न्यायव्यवस्थांकडे न्याय मागणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखेच असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. तर मुंबईतील आंदोलनात सुद्धा मुस्लिमांपेक्षा इतर समाजातील लोकांची अधिक उपस्थिती होती. त्यामुळे यातून स्पष्ट होते की, मुस्लीम समजाप्रमाणे हिंदू सुद्धा नागरिकत्व कायद्याचा विरोधात असल्याचे आंबेडकर म्हणाले.