शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 12:32 IST

अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

मुंबई: औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच यावेळी त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नसल्याने न्यायाची अपेक्षा करणेच चुकीचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

औरंगाबादेत शुक्रवारी नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एनआरसी लागू करणार नाही असे केंद्र सरकार सांगत आहे. मग महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारण्यासाठी जागा का निश्चित करण्यात आली? दीड ते पाच लाख नागरिक ठेवण्यासाठी हे सेंटर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर मुस्लिम समाज या कायद्यामुळे जागृत झाला. मागासलेले 40 टक्के नागरिक अजूनही जागृत झाले नाहीत. हे हिंदू बांधवही एनआरसीचा शिकार होणार असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

तर याच मुद्यावरून त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही. सरकारच्या तावडीत ही व्यवस्था सापडली आहे. त्यामुळे अशा न्यायव्यवस्थांकडे न्याय मागणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखेच असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. तर मुंबईतील आंदोलनात सुद्धा मुस्लिमांपेक्षा इतर समाजातील लोकांची अधिक उपस्थिती होती. त्यामुळे यातून स्पष्ट होते की, मुस्लीम समजाप्रमाणे हिंदू सुद्धा नागरिकत्व कायद्याचा विरोधात असल्याचे आंबेडकर म्हणाले.