शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 12:32 IST

अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

मुंबई: औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच यावेळी त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नसल्याने न्यायाची अपेक्षा करणेच चुकीचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

औरंगाबादेत शुक्रवारी नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एनआरसी लागू करणार नाही असे केंद्र सरकार सांगत आहे. मग महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारण्यासाठी जागा का निश्चित करण्यात आली? दीड ते पाच लाख नागरिक ठेवण्यासाठी हे सेंटर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर मुस्लिम समाज या कायद्यामुळे जागृत झाला. मागासलेले 40 टक्के नागरिक अजूनही जागृत झाले नाहीत. हे हिंदू बांधवही एनआरसीचा शिकार होणार असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

तर याच मुद्यावरून त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही. सरकारच्या तावडीत ही व्यवस्था सापडली आहे. त्यामुळे अशा न्यायव्यवस्थांकडे न्याय मागणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखेच असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. तर मुंबईतील आंदोलनात सुद्धा मुस्लिमांपेक्षा इतर समाजातील लोकांची अधिक उपस्थिती होती. त्यामुळे यातून स्पष्ट होते की, मुस्लीम समजाप्रमाणे हिंदू सुद्धा नागरिकत्व कायद्याचा विरोधात असल्याचे आंबेडकर म्हणाले.