शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

अध्यक्षपदाच्या व्यूहरचनेतून आता माघार नाही

By admin | Updated: October 10, 2016 03:10 IST

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊन मागे हटण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, अशी भूमिका अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली. मी अर्ज भरण्यामागे कोणतेही राजकारण नाही, तर साहित्य रसिकांचे मला मिळालेले प्रेमकारण आहे. त्यामुळे पद मिळाले नाही, तरी मी दु:खी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीला दवणे उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच ती बातमी केवळ माध्यमांतच नव्हे, तर सोशल मीडियावरूनही झळकली. मी उभा राहिल्याने आनंद व्यक्त करून मला पाठिंबा मिळाला. निवडणुकीच्या खर्चासाठी मदतीचे आश्वासन दिले, असे त्यांनी सांगितले. संमेलनात युवक आणि ग्रामीण भागांतील साहित्यिकांना व्यासपीठ मिळायला हवे. साहित्याचा कोणताही विषय सध्याच्या फास्ट जीवनशैलीत ‘ब्रेकिंग न्यूज’ न होता तो ‘लिंकिंग न्यूज’ व्हायला हवा. मला अध्यक्षपद मिळाले, तर सृजनात्मक साहित्यिक काम करण्यावर मी भर देणार आहे. विविध महाविद्यालयांत मराठी भाषेची वाड्.मयमंडळे आहेत. त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचवण्याचे काम करणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्याचा कार्यअहवाल साहित्य महामंडळाकडे सादर करेन, असा संकल्पच त्यांनी जाहीर केला. सध्या मातृभाषेचे विद्रूपीकरण होत आहे. मराठी भाषेवर इतर भाषांचे अतिक्रमण वाढले आहे. मराठी भाषिक विद्यार्थी इंग्रजीतून शिक्षण घेतो. तेव्हा तो गणेशाला ‘एलिफंट गॉड’ असे म्हणत असेल, तर तो मराठी असूनही त्यांच्या भाषेचे काय होणार? हे विद्रूपीकरण थांबवण्याचे काम करण्यावर भर देऊ. साहित्याच्या संवेदनशीलतेचा उत्कट पदर हरवता कामा नये. साठच्या दशकातील आमची पिढी साहित्यावर तरली आहे. आमच्या जगण्याचा पाया साहित्य होता. आजचा तरुण निराश आहे. आत्महत्या करीत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)लेखक आपल्या भेटीलाच्संमेलनात ‘लेखक आपल्या भेटीला’ असा एखादा कार्यक्रम करण्याची सूचना दवणे यांनी केली. या भेटीचा फायदा तरुण पिढीला आणि नवोदितांना होईल. च्लेखक कसा घडला, यापासून कसे लिहावे, नकार कसा पचवावा, उद्दिष्ट कसे गाठावे, हे सर्व त्यांना समजेल. त्यांची उमेद वाढेल, असा दाखला त्यांनी दिला.