शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाच्या व्यूहरचनेतून आता माघार नाही

By admin | Updated: October 10, 2016 03:10 IST

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊन मागे हटण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, अशी भूमिका अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली. मी अर्ज भरण्यामागे कोणतेही राजकारण नाही, तर साहित्य रसिकांचे मला मिळालेले प्रेमकारण आहे. त्यामुळे पद मिळाले नाही, तरी मी दु:खी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीला दवणे उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच ती बातमी केवळ माध्यमांतच नव्हे, तर सोशल मीडियावरूनही झळकली. मी उभा राहिल्याने आनंद व्यक्त करून मला पाठिंबा मिळाला. निवडणुकीच्या खर्चासाठी मदतीचे आश्वासन दिले, असे त्यांनी सांगितले. संमेलनात युवक आणि ग्रामीण भागांतील साहित्यिकांना व्यासपीठ मिळायला हवे. साहित्याचा कोणताही विषय सध्याच्या फास्ट जीवनशैलीत ‘ब्रेकिंग न्यूज’ न होता तो ‘लिंकिंग न्यूज’ व्हायला हवा. मला अध्यक्षपद मिळाले, तर सृजनात्मक साहित्यिक काम करण्यावर मी भर देणार आहे. विविध महाविद्यालयांत मराठी भाषेची वाड्.मयमंडळे आहेत. त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचवण्याचे काम करणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्याचा कार्यअहवाल साहित्य महामंडळाकडे सादर करेन, असा संकल्पच त्यांनी जाहीर केला. सध्या मातृभाषेचे विद्रूपीकरण होत आहे. मराठी भाषेवर इतर भाषांचे अतिक्रमण वाढले आहे. मराठी भाषिक विद्यार्थी इंग्रजीतून शिक्षण घेतो. तेव्हा तो गणेशाला ‘एलिफंट गॉड’ असे म्हणत असेल, तर तो मराठी असूनही त्यांच्या भाषेचे काय होणार? हे विद्रूपीकरण थांबवण्याचे काम करण्यावर भर देऊ. साहित्याच्या संवेदनशीलतेचा उत्कट पदर हरवता कामा नये. साठच्या दशकातील आमची पिढी साहित्यावर तरली आहे. आमच्या जगण्याचा पाया साहित्य होता. आजचा तरुण निराश आहे. आत्महत्या करीत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)लेखक आपल्या भेटीलाच्संमेलनात ‘लेखक आपल्या भेटीला’ असा एखादा कार्यक्रम करण्याची सूचना दवणे यांनी केली. या भेटीचा फायदा तरुण पिढीला आणि नवोदितांना होईल. च्लेखक कसा घडला, यापासून कसे लिहावे, नकार कसा पचवावा, उद्दिष्ट कसे गाठावे, हे सर्व त्यांना समजेल. त्यांची उमेद वाढेल, असा दाखला त्यांनी दिला.