शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात एकही नवे वसतीगृह, आश्रमशाळा नाही

By admin | Updated: July 10, 2017 03:36 IST

पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी, पालघर, वसईसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात एकही नवीन वस्तीगृह, आश्रमशाळा, सुरू झालेले नाही.

शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू: डहाणू तालुक्यात एका बाजूला इयत्ता आठवीतून पास झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना नववीत प्रवेश मिळत नसल्याने प्रवेशासाठी त्यांना वणवण भटकण्याची वेळ आली असतांनाच गेल्या वर्षभरात पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी, पालघर, वसईसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात एकही नवीन वस्तीगृह, आश्रमशाळा, सुरू झालेले नाही. त्यामुळे दहावी, बारावी, पास झाल्यानंतर शहरातील वस्तीगृहात राहून महागडे शिक्षण घेण्याची पाळी आदिवासी विद्यार्थ्यांवर येते आहे. म्हणून सध्याच्या आश्रमशाळा व वस्तीगृहांची क्षमता वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने त्वरीत नवीन वस्तीगृह व आश्रमशाळा सुरू कराव्यात. शिवाय विद्यमान वस्तीगृहात पलंग, गाद्या, तसेच सोयी सुविधांचा पुरवठा करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करावे. अन्यथा पांच हजाराचा मोर्चा कढून आंदोलन करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेट्ररी कॉ. अ‍ॅडवर्ड वरठा, जि.प. सदस्य रडका कलांगडा यांनी दिला आहे.डहाणू एकात्मिक आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या डहाणू, तलासरी, पालघर, वसई, तालुक्यात गेल्या वर्षभरात एकही नवीन वस्तीगृह अथवा आश्रमशाळा सुरू झालेलली नाही. किंवा आहेत त्यांची क्षमताही वाढविली गेलेली नाही. त्यामुळे दहावी, बारावी, उत्तीर्ण झालेल्या आदिवासी मुला, मुलींना प्रवेश मिळणे जिकरीचे झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही आॅनलाईन अर्ज करणाऱ्या तसेच आमदार, खासदार, पालकमंत्र्यांची शिफारस आणणाऱ्यांनाही निवासी वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने शेकडो विद्यार्थ्यांना सायवन, किन्हवली, शिलोंडा, दिवसी, दाभाडी, शेणसरी, इत्यादी गावातून दररोज कासा, डहाणू येथे जाऊन येऊन शिक्षण घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. वस्तीगृह बरोबरच ३५ आश्रम शाळा आहे. त्यास सुमारे १६ हजार आदिवासी विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे. त्यांना दररोज नाश्ता, दुध, केळी, अंडी, बरोबरच दोन वेळचे भोजन आदिवासी विकास विभागामार्फत पुरविले जाते. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या आदिवासी पालकांना त्यांच्या शिक्षणाची चिंता करावी लागत नाही. परतु आश्रमशाळा किंवा वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या आई-वडीलांना आपल्या मुलांना बरोबर घेऊन जावे लागते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.दरम्यान डहाणूच्या कासा भागांतील असंख्य गाव पाड्यात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने डहाणू तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, निवासी वसतीगृह, आश्रमशाळांची संख्या कमी पडू लागल्याने गोर,गरीब, निरक्षर आदिवासी पालक चिंताग्रस्त झाले आहेत. या बाबतीत डहाणूच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आवाज उठविला असून कासा, डहाणू, बोईसर, चिंचणी, पालघर येथे नवीन वस्तीगृहे सुरू करण्याची मागणी केली आहे. येत्या १० जुलै रोजी कम्युनिस्टांचे शिष्टमंडळ प्रकल्प अधिकारी तथा डहाणूच्या प्रांत. लता आंचल गोयल यांना भेटणार असून मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.