शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

...तर शासकीय कर्मचा-यांना वेतनवाढ, पदोन्नती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 16:16 IST

अ, ब व क संवर्गाचा समावेश

गणेश वासनिक अमरावती : राज्य शासनाच्या आस्थापनेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणक हाताळणी आणि वापराचे परिपूर्ण ज्ञान अनिवार्य आहे. अन्यथा यापुढे कर्मचाºयांना वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.शासन-प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असलेल्या कर्मचाºयांना बदलत्या काळानुसार त्यांचे ज्ञानात अधिक भर पडावी. प्रशासनाकडून नागरिकांचे कामे सुलभतेने आणि वेळेपूर्वी व्हावे, यासाठी गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचा-यांना संगणकाचे ज्ञान अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९९९ रोजीच्या अधिसूचनेद्वारे ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. शासन अधिसूचना २५ जानेवारी १९९९ व ३ मे २००० आणि २८ मे २०१८ अन्वये शासकीय कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान आवश्यक केले आहे. मात्र, बहुतांश विभागातील  समावेश गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांनी अद्यापही संगणक हाताळणी, वापराचे ज्ञान विकसित केले नाही. त्यामुळे अशा कर्मचाºयांकडे असलेल्या नागरिकांची दैनंदिन कामे वेळेत होत नाही. कार्यालयप्रमुखांनी अनेकदा संगणकाचे ज्ञान नसलेल्या कर्मचा-यांना नोटीस वजा आदेशान्वये शासन निर्णयाची जाणीव करून दिली आहे. परंतु, सरकारी कर्मचारी म्हटले की, ‘काय होते’ हा त्यांचा परवलीचा शब्द आहे.

मात्र, आता सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी ३ जुलै २०१८ रोजी परिपत्रक जारी करून कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असे आदेश निगर्मित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांवर सोपविली आहे. राज्यात १९ लाख कर्मचारी असून, यात सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचा समावेश आहे.

वयाची ५० वर्षे पूर्ण करणा-यांना सूटशासन सेवेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही, असे आदेश आहेत. मात्र, या आदेशातून वयाची ५० वर्षे पूर्ण करणाºया कर्मचा-यांना सूट देण्यात आली आहे. कर्मचाºयांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण नसले तरी वय ५० पूर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा शासन निर्णयानुसार लाभ मिळणार नाही, हे वास्तव आहे.

बदलत्या काळानुसार कर्मचाºयांना कामात बदल करणे अपेक्षित आहे. नागरी सुविधांमध्ये झपाट्याने आमूलाग्र बदल होत असल्याने कर्मचा-यांनी संगणकाचे ज्ञान प्राप्त करणे काळाची गरज आहे. यापूर्वीच कर्मचा-यांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षणाबाबत मााहिती दिली आहे.- नामदेव गडलिंग,जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, अमरावती