शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

१६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही! जगण्याने न केली सुटका, मरण्यानेही छळले आहे’

By यदू जोशी | Updated: February 16, 2018 01:41 IST

प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.

मुंबई : प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.या गावांत स्वत:च्या मालकीच्या जागेत, शेतात वा पडीक सरकारी जमिनीवर अंत्यसंस्कार उरकले जातात. उघड्यावर अंत्यसंस्कार करताना कोणत्याही सुविधा नसतात. विशेषत: पावसाळ्यांमध्ये तर मृतदेह अर्धवट जळून त्यांची अक्षरश: विटंबना होते. अनेक गावे अशी आहेत की, जिथे सवर्ण जातींतील व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात तिथे दलितांना अंत्यविधी करण्यास मनाई केली जाते. त्यातून तणावाचे प्रसंग निर्माण होतात.मराठवाड्यातील लालसेनेचे नेते गणपत भिसे यांनी या प्रश्नावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला आहे. प्रगत महाराष्ट्रात मरणानंतरही माणसांचे हाल का व्हावेत, असा सवाल त्यांनी केला.राज्यातील ज्या २८ हजार २१ खेड्यांबाबत माहिती एकत्रित करता आली. त्यातील १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमींची महसूल खात्याकडे नोंद नाही. उर्वरित गावांमध्ये स्मशानभूमीची नोंद आहे; पण तिथे स्मशानभूमी आहे असे नाही. अनेक गावांत स्मशानभूमींच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. स्मशानभूमीच नसलेल्या गावांत शेतांमध्ये, नदी वा ओढ्याच्या काठावर, गायरान, महारवतनाच्या जागेवर अंत्यविधी केले जातात. या पार्श्वभूमीवर, स्मशानभूमींपासून वंचित असलेल्या गावांत एका मॉडेलच्या आदर्शस्मशानभूमी उभाराव्यात आणि तिथे सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना समोर आली आहे. एक गाव एक पाणवठा या संकल्पनेने महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याचे उदाहरण घालून दिले, एक गाव, एक स्मशानभूमी मात्र अजूनही १६ हजार गावांच्या नशिबी नाही. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, असे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिले. मात्र स्मशानभूमींअभावी राज्याच्या ग्रामीण भागात, जगण्याने न केली सुटका, मरणानेही छळले आहे’.स्मशानभूमीच नसलेल्या गावांची विभागनिहाय संख्याकोकण २२३७नाशिक २४८२पुणे ३५७८नागपूर २७०१अमरावती २४१७औरंगाबाद २७८१

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र