शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

१६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही! जगण्याने न केली सुटका, मरण्यानेही छळले आहे’

By यदू जोशी | Updated: February 16, 2018 01:41 IST

प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.

मुंबई : प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.या गावांत स्वत:च्या मालकीच्या जागेत, शेतात वा पडीक सरकारी जमिनीवर अंत्यसंस्कार उरकले जातात. उघड्यावर अंत्यसंस्कार करताना कोणत्याही सुविधा नसतात. विशेषत: पावसाळ्यांमध्ये तर मृतदेह अर्धवट जळून त्यांची अक्षरश: विटंबना होते. अनेक गावे अशी आहेत की, जिथे सवर्ण जातींतील व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात तिथे दलितांना अंत्यविधी करण्यास मनाई केली जाते. त्यातून तणावाचे प्रसंग निर्माण होतात.मराठवाड्यातील लालसेनेचे नेते गणपत भिसे यांनी या प्रश्नावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला आहे. प्रगत महाराष्ट्रात मरणानंतरही माणसांचे हाल का व्हावेत, असा सवाल त्यांनी केला.राज्यातील ज्या २८ हजार २१ खेड्यांबाबत माहिती एकत्रित करता आली. त्यातील १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमींची महसूल खात्याकडे नोंद नाही. उर्वरित गावांमध्ये स्मशानभूमीची नोंद आहे; पण तिथे स्मशानभूमी आहे असे नाही. अनेक गावांत स्मशानभूमींच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. स्मशानभूमीच नसलेल्या गावांत शेतांमध्ये, नदी वा ओढ्याच्या काठावर, गायरान, महारवतनाच्या जागेवर अंत्यविधी केले जातात. या पार्श्वभूमीवर, स्मशानभूमींपासून वंचित असलेल्या गावांत एका मॉडेलच्या आदर्शस्मशानभूमी उभाराव्यात आणि तिथे सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना समोर आली आहे. एक गाव एक पाणवठा या संकल्पनेने महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याचे उदाहरण घालून दिले, एक गाव, एक स्मशानभूमी मात्र अजूनही १६ हजार गावांच्या नशिबी नाही. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, असे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिले. मात्र स्मशानभूमींअभावी राज्याच्या ग्रामीण भागात, जगण्याने न केली सुटका, मरणानेही छळले आहे’.स्मशानभूमीच नसलेल्या गावांची विभागनिहाय संख्याकोकण २२३७नाशिक २४८२पुणे ३५७८नागपूर २७०१अमरावती २४१७औरंगाबाद २७८१

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र