शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही! जगण्याने न केली सुटका, मरण्यानेही छळले आहे’

By यदू जोशी | Updated: February 16, 2018 01:41 IST

प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.

मुंबई : प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.या गावांत स्वत:च्या मालकीच्या जागेत, शेतात वा पडीक सरकारी जमिनीवर अंत्यसंस्कार उरकले जातात. उघड्यावर अंत्यसंस्कार करताना कोणत्याही सुविधा नसतात. विशेषत: पावसाळ्यांमध्ये तर मृतदेह अर्धवट जळून त्यांची अक्षरश: विटंबना होते. अनेक गावे अशी आहेत की, जिथे सवर्ण जातींतील व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात तिथे दलितांना अंत्यविधी करण्यास मनाई केली जाते. त्यातून तणावाचे प्रसंग निर्माण होतात.मराठवाड्यातील लालसेनेचे नेते गणपत भिसे यांनी या प्रश्नावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला आहे. प्रगत महाराष्ट्रात मरणानंतरही माणसांचे हाल का व्हावेत, असा सवाल त्यांनी केला.राज्यातील ज्या २८ हजार २१ खेड्यांबाबत माहिती एकत्रित करता आली. त्यातील १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमींची महसूल खात्याकडे नोंद नाही. उर्वरित गावांमध्ये स्मशानभूमीची नोंद आहे; पण तिथे स्मशानभूमी आहे असे नाही. अनेक गावांत स्मशानभूमींच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. स्मशानभूमीच नसलेल्या गावांत शेतांमध्ये, नदी वा ओढ्याच्या काठावर, गायरान, महारवतनाच्या जागेवर अंत्यविधी केले जातात. या पार्श्वभूमीवर, स्मशानभूमींपासून वंचित असलेल्या गावांत एका मॉडेलच्या आदर्शस्मशानभूमी उभाराव्यात आणि तिथे सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना समोर आली आहे. एक गाव एक पाणवठा या संकल्पनेने महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याचे उदाहरण घालून दिले, एक गाव, एक स्मशानभूमी मात्र अजूनही १६ हजार गावांच्या नशिबी नाही. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, असे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिले. मात्र स्मशानभूमींअभावी राज्याच्या ग्रामीण भागात, जगण्याने न केली सुटका, मरणानेही छळले आहे’.स्मशानभूमीच नसलेल्या गावांची विभागनिहाय संख्याकोकण २२३७नाशिक २४८२पुणे ३५७८नागपूर २७०१अमरावती २४१७औरंगाबाद २७८१

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र