शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज: कल्याण लोकसभेसाठी मनसे आणि CM एकनाथ शिंदे गटात मनोमिलन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 09:13 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे कल्याण लाेकसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा केल्याचा अंदाज  राजकीय दिग्गजांमध्ये आहे.

मनोमिलन की प्रतिस्पर्धी?

लाेकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे विविध राजकीय पक्षांसह इच्छुकांची सध्या मांदियाळी सुरू आहे. त्यात खासदार, आमदारांचा वादविवादही सध्या चर्चेचा विषय आहे. यास अनुसरून कल्याण लाेकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमाेद पाटील उर्फ राजू पाटील यांच्यातील विविध मुद्द्यांवर हाेत असलेले वादविवाद चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात लाेकसभेसाठी पाटील इच्छुक असल्यामुळे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ते वावरत असल्याची चर्चा आहे. शिळफाटा रस्त्यावरून त्यांच्यात अलीकडेच वाद झाला. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे कल्याण लाेकसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा केल्याचा अंदाज  राजकीय दिग्गजांमध्ये आहे. पाटील यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द लक्षात घेऊन त्यांच्या उमेदवारीसाठीही चर्चा झाल्याचे बाेलले जात आहे. त्यामुळे मनोमिलन झाले की प्रतिस्पर्धी म्हणून लढणार याविषयी सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत.

शिवसेनेच्या कंटेनर शाखा फुटपाथवर 

ठाण्यात फुटपाथ हे चालण्यासाठी असावेत या उद्देशाने ठाणे महापालिकेने फुटपाथवरून फेरीवाले असतील किंवा इतरांना हटविले आहे. त्यामुळे फुटपाथ थोड्या प्रमाणात का होईना मोकळे झाले. मात्र आता या फुटपाथवरून ठाण्यातील राजकारण तापले आहे. याच फुटपाथवर सध्या क्रेनच्या मदतीने शिवसेनेच्या कंटेनर शाखा उभ्या राहत आहेत. त्यावर आता शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. फेरीवाले चालतात मग शाखा का चालत नाही? असा सवाल करीत शिंदे गटानेही याचे समर्थन केले आहे. शाखा ताब्यात घेण्यापासून सुरू असलेला वाद आता कंटेनरपर्यंत येऊन ठेपला आहे.

घरे नियमित कधी होणार?

निवडणुका जवळ आल्या की, नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचे आश्वासन दिले जाते. मागील अनेक वर्षांमध्ये सिडकोने घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. शासनाने घरे नियमित करण्यासाठी मंजुरी दिली अशी आश्वासने वारंवार देण्यात आली. घरे नियमित केल्याबद्दल अनेक लोकप्रतिनिधींचे सत्कारही झाले. पण, प्रत्यक्षात एकही घर अद्याप नियमित झालेले नाही. अनधिकृत झोपड्या अधिकृत ठरवून  त्या जागेवर एसआरएची कार्यवाही झाली. पण, ज्यांनी नवी मुंबई वसविण्यासाठी जमिनीचा त्याग केला, त्या भूमिपुत्रांची घरे नियमित कधी होणार, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  न्याय देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात असून, यावेळी तरी प्रत्यक्षात घरे नियमित होणार की, पुन्हा निवडणुका जवळ आल्या की, फक्त आश्वासने मिळणार, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे