शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"पुतळा 35 फुटांचा असणार हे सांगितलेच नाही", अधिकाऱ्याचा नवा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:01 IST

Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या परवानगीबद्दल राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी वेगळाच दावा केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर एक दुर्घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता राज्याच्या कला संचालनालयाच्या संचालकांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राजीव मिश्रा यांनी पुतळ्याच्या उंचीबद्दल वेगळीच माहिती दिली. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक राजीव मिश्रा यांनी ३५ फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली गेलीच नव्हती, अशी माहिती दिली. ६ फुटांच्या पुतळ्यालाच परवानगी दिली गेली होती, असे राजीव मिश्रा म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा : राजीव मिश्रांनी काय सांगितले?

राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा म्हणाले की, "या प्रकरणात असे झाले की, क्ले मॉडेलला मान्यता त्यांनी घेतली आणि आमच्याकडून नौदलाला ही मान्यता देण्यात आली. जेव्हा ही मान्यता दिली गेली, तेव्हा आम्हाला हे सांगितले गेले नव्हते की, हा पुतळा ३५ फुटाचा असणार आहे. आणि या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टील वापरणार आहेत", अशी माहिती मिश्रा यांनी दिली.  

"आमच्याकडे फक्त ६ फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती. जेव्हा जेव्हा त्यांना हे करायचं (पुतळा उभारायचा) असते, तेव्हा त्यांनी माहिती दिली नाही, तर आम्हाला त्यांना विचारता येत नाही. तशी तरतूद नाही. या पुतळ्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे आम्हाला काही करता आले नाही. याबाबती त्या लोकांनी त्यांच्याच स्तरावर निर्णय घेतला", असेही राजीव मिश्रा यांनी सांगितले. 

चुकीचा पुतळा उभारण्यासाठी जबाबदार कोण?

या प्रश्नाला उत्तर देताना राजीव मिश्रा म्हणाले की, "जेव्हा कलाकारांकडे हे काम दिले गेले, तेव्हा ज्या एजन्सीने त्यांना उंची आणि मटेरियल ठरवण्याचा निर्णय दिला. त्या समितीमध्ये कलाकारांनी हे सांगायला पाहिजे होते की, मी हे ३५ फुटांचा पुतळा करणार आहे. मला त्यासाठी तांत्रिक मदत लागेल. तांत्रिक सहाय्य म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरची त्याला मदत घ्यावी लागेल", अशी भूमिका मिश्रा यांनी मांडली. 

टॅग्स :MumbaiमुंबईShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड