शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:32 IST

एमएमआरडीएने १० जून रोजी पत्र लिहून एल अँड टीला या प्रकल्पाच्या आर्थिक निविदेसाठी भरलेला संपूर्ण आर्थिक अंदाजपत्राचा तपशिल सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: एल अँड टी कंपनीने मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाचा अंदाजित खर्च, दरपत्रक आणि त्यास पूरक कागदपत्रांची प्रत आठवड्यानंतरही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सादर केलेली नाही. एमएमआरडीएने १० जून रोजी पत्र लिहून एल अँड टीला या प्रकल्पाच्या आर्थिक निविदेसाठी भरलेला संपूर्ण आर्थिक अंदाजपत्राचा तपशिल सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मीरा भाईंदर ते गायमुख हा १५.५ किमी लांबीचा मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एल अँड टी कंपनीने भरलेल्या निविदा तांत्रिक तपासणीत एमएमआरडीएने बाद केल्या होत्या. 

एमएमआरडीएने निविदा कोणत्या कारणांनी बाद केल्या याची माहिती एल अँड टीला दिली नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयात त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे एल अँड टीने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.

पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थितसुनावणीवेळी एल अँड टीने न्यायालयात उन्नत मार्गासाठी ५,५५४ कोटींची, तर रस्ता आणि भुयारी मार्गासाठी ६,४९८ कोटी रुपयांची निविदा भरल्याचे सांगितले होते. ही निविदा या प्रकल्पासाठी लघुतम निविदा दाखल केलेल्या मेघा इंजिनियरिंगपेक्षा ३,१०० कोटी रुपयांनी कमी असल्याचे न्यायालयात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करून निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एमएमआरडीएने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने या निविदा रद्द करण्याची तयारी दर्शविली होती.

‘एल अँड टी’ अपात्र का?- तेलंगणातील मेडिगड्डा बॅरेज दुर्घटनेचा खुलासा न करणे.- बोली प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांचा अपुरा पुरवठा.

निविदा प्रक्रिया  पुन्हा राबवणारएमएमआरडीए पुन्हा निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. एल अँड टीने दिलेली माहिती टेन्डर रिव्ह्यू कमिटीकडे पाठविणार असून त्याआधारे पुढील बोलीदात्यांसाठी तुलनात्मक आधार निश्चित केला जाईल, असे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. त्या माहितीचा सविस्तर आढावा घेऊन, तज्ज्ञांच्या मदतीने अंदाज पुन्हा तयार करण्यात येतील, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकता आणि न्याय्य तत्वांशी सुसंगत राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबईroad transportरस्ते वाहतूक