शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?’; उद्धव ठाकरेंना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:15 IST

राऊतांचे नातलग आमच्यासाेबत असते तर असे वाक्य वापरले असते काय? आम्ही गद्दारी नाही, तर शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केलेला आहे, असेही शिरसाट म्हणाले.

नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्री पदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी ठाकरे यांना केला. जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते अपक्ष म्हणून विजयी झाले व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला  होता.

जवळच्यांकडून सेना संपवण्याचा डाव

‘महाविकास आघाडीत अडीच वर्षे गळचेपी झाली. सहनशीलतेचा अंत झाला, त्यामुळेच उठाव केला. आम्ही पक्षातच असून, उध्दव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडूनच शिवसेना संपविण्याचा डाव आहे,’ असा हल्लाबोल माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शंभूराज देसाई  १५ दिवसांनंतर  बुधवारी प्रथमच साताऱ्यात आले. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

‘ती’ चांडाळचौकडी बाजूला करा - शिरसाट

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यासह ‘मातोश्री’वर असलेली चांडाळचौकडी शिवसेना बुडविल्याविना राहणार नाही. राऊत जे म्हणतील, त्याप्रमाणे शिवसेना सध्या हलते आहे. काही ‘झेलेकरी’ त्यांची पालखी वाहत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. ती  चांडाळचौकडी बाजूला केली तरच पक्षाचे भवितव्य असल्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. 

संजय राऊत यांनी गुवाहाटीत गेलेल्या आमदारांना वेश्यांची उपमा दिली. आमच्यासोबत काही महिला आमदार होत्या. त्या रडल्या, गळ्यात पाटी लटकवून कामाठीपुऱ्यात आम्हाला पाठवा, असे ते बोलले. राऊतांचे नातलग आमच्यासाेबत असते तर असे वाक्य वापरले असते काय? आम्ही गद्दारी नाही, तर शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केलेला आहे, असेही शिरसाट म्हणाले.

आठ दिवसात चमत्कार - जैस्वाल शिवसेनेने केलेल्या टीकेला काहीही उत्तर  न देता आठ दिवसात चमत्कार घडेल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केला. 

शिंदे गटाच्या आमदारांचे एकच लक्ष्य संजय राऊत

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही या आमदारांनी केला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे