शहरं
Join us  
Trending Stories
1
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
2
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
3
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
4
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
5
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
6
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
7
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
8
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
9
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
10
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
11
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
12
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
13
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
14
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
15
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
16
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
17
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
18
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
19
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
20
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 21:29 IST

Raj Thackeray News: मागील काही वर्षात ठाकरे आणि पवार या घराण्याभोवती राजकारण केंद्रीत झाले आहे. ठाकरे-पवार यांना लक्ष्य केले जात आहे. याबद्दलच राज ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.  

Raj Thackeray: ठाकरे आणि पवार ब्रॅण्ड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितच सुरू आहेत, पण ते संपणार नाहीत, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राजकारण सोडा, पण महाराष्ट्र आज खूप वाईट अवस्थेमध्ये आहे, एवढं निश्चित आहे, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई तकला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. 

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सद्यस्थिती ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. 

ठाकरे पवार ब्रॅण्ड संपणार नाही -राज ठाकरे

या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, 'संपवण्याचा प्रयत्न चाललाय यात काही वाद नाही. निश्चितच! पण, तो संपणार नाही. मी हे लिहून द्यायला तयार आहे. तो संपणार नाही."

वाचा >>पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

"प्रश्न असा आहे की, या सगळ्यांमध्ये आमचे आजोबा. महाराष्ट्रावर पहिला परिणाम जर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या बरोबरीने तुम्ही संगीतात किंवा इतर क्षेत्रात बघितलं तर माझे वडील श्रीकांत ठाकरे. त्यानंतर माझा. मी येतो, उद्धव येतो", असे राज ठाकरे म्हणाले. 

"प्रश्न असा आहे की, या सगळ्यात व्यक्ती येतातच, पण आडनाव असतंच. मला असं वाटतं की, आडनाव हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे", असे राज ठाकरे म्हणाले. 

मला खरं काय ते दिसतं -राज ठाकरे

सगळे जेव्हा उजवीकडे (भाजप) जात असतात, तुम्ही डावीकडे का जाता? असा प्रश्नही राज ठाकरेंना विचारण्यात आला. 

राज ठाकरे म्हणाले, 'मला खरं काय ते दिसतं. ताज उदाहरण म्हणजे मी आता युद्धाबद्दल बोललो होतो. सहा अतिरेक्यांना मारण्यासाठी किंवा अतिरेकी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नाही. आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणून शकत नाही."

"देशाच्या समोर सगळ्या गोष्टी आल्या. त्याला तुम्ही आता काय म्हणणार? आपण आपलं काय करून घेतलं? मी माझ्या त्यावेळी म्हटलं होतं की, हीच संधी आहे. आपल्या हाताला काय लागलं?", असे प्रश्न राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षाबद्दल केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण