शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 21:29 IST

Raj Thackeray News: मागील काही वर्षात ठाकरे आणि पवार या घराण्याभोवती राजकारण केंद्रीत झाले आहे. ठाकरे-पवार यांना लक्ष्य केले जात आहे. याबद्दलच राज ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.  

Raj Thackeray: ठाकरे आणि पवार ब्रॅण्ड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितच सुरू आहेत, पण ते संपणार नाहीत, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राजकारण सोडा, पण महाराष्ट्र आज खूप वाईट अवस्थेमध्ये आहे, एवढं निश्चित आहे, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई तकला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. 

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सद्यस्थिती ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. 

ठाकरे पवार ब्रॅण्ड संपणार नाही -राज ठाकरे

या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, 'संपवण्याचा प्रयत्न चाललाय यात काही वाद नाही. निश्चितच! पण, तो संपणार नाही. मी हे लिहून द्यायला तयार आहे. तो संपणार नाही."

वाचा >>पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

"प्रश्न असा आहे की, या सगळ्यांमध्ये आमचे आजोबा. महाराष्ट्रावर पहिला परिणाम जर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या बरोबरीने तुम्ही संगीतात किंवा इतर क्षेत्रात बघितलं तर माझे वडील श्रीकांत ठाकरे. त्यानंतर माझा. मी येतो, उद्धव येतो", असे राज ठाकरे म्हणाले. 

"प्रश्न असा आहे की, या सगळ्यात व्यक्ती येतातच, पण आडनाव असतंच. मला असं वाटतं की, आडनाव हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे", असे राज ठाकरे म्हणाले. 

मला खरं काय ते दिसतं -राज ठाकरे

सगळे जेव्हा उजवीकडे (भाजप) जात असतात, तुम्ही डावीकडे का जाता? असा प्रश्नही राज ठाकरेंना विचारण्यात आला. 

राज ठाकरे म्हणाले, 'मला खरं काय ते दिसतं. ताज उदाहरण म्हणजे मी आता युद्धाबद्दल बोललो होतो. सहा अतिरेक्यांना मारण्यासाठी किंवा अतिरेकी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नाही. आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणून शकत नाही."

"देशाच्या समोर सगळ्या गोष्टी आल्या. त्याला तुम्ही आता काय म्हणणार? आपण आपलं काय करून घेतलं? मी माझ्या त्यावेळी म्हटलं होतं की, हीच संधी आहे. आपल्या हाताला काय लागलं?", असे प्रश्न राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षाबद्दल केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण