शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

...म्हणून खासगी उद्योग समूहांना वीज वितरणात रस आहे; जाणून घ्या, यामागचं महत्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 09:55 IST

फायदा असलेल्या भागात खासगी उद्योग समूह वीज वितरण करणार आणि तोटा आहे, वसुली नाही, तो भाग महावितरणकडे; ही कसली स्पर्धा?

- संजीव साबडे

वीज कर्मचाऱ्यांनी राज्यात काही भागातील वीज वितरणाचे अधिकार खासगी कंपन्यांना देण्याच्या विरोधातील गेल्या आठवड्यात पुकारलेला तीन दिवसांचा संप पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला. वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही, वितरणाचे अधिकार खासगी कंपन्यांना देऊ नये यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगापुढे बाजू मांडू आणि वीज कंपन्यांसाठी तीस हजार कोटींची तरतूद केली जाईल, अशी आश्वासने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली;  पण खासगी कंपन्यांना वीज वितरणाचे समांतर अधिकार देण्याची तरतूद कायद्यातच आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या हाती काहीच नाही. 

एका खासगी उद्योग समूहाने नवी मुंबई, पनवेल या भागांत आम्हालाही वीज वितरण करू द्या, अशी विनंती आयोगाला केली, हे या चर्चेमागचे ताजे कारण.  स्पर्धा असायलाच हवी, असे अनेकांना वाटते; पण मग गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, हिंगोली, परभणी या भागांत वीज वितरणाची परवानगी खासगी समूह का मागत नाही, याचे कारण तिथे नफ्याची शक्यता नाही. जिथे वीज बिलांची वसुली जवळपास १०० टक्के आहे, जिथे विजेचा वापर आणि नफाही अधिक आहे, असा फायदेशीर भागच खासगी कंपनीला हवा आहे. त्याला स्पर्धा हे गोंडस नाव दिले आहे, एवढेच! महावितरण व खासगी कंपन्या यांच्यातील स्पर्धा विसंगत आहे. महावितरणवर कृषिपंपांच्या थकबाकीचा डोलारा सुमारे पन्नास हजार कोटींच्या आसपास आहे.  

विशेषतः २०१४नंतर युती सरकारने शेतकरी पैसे भरो अथवा ना भरो, आम्ही वीज कापणार नाही, अशी भूमिका घेतली. तेव्हापासून थकबाकी वाढतच गेली. २०१४ मध्ये ११ हजार कोटींच्या आसपास असलेली थकबाकी आज ५० हजार कोटींवर गेली आहे. शेतकरी पैसे थकवतात तर आम्ही पैसे का भरायचे, हा विचार घरगुती ग्राहकही करू लागल्याचा फटकाही महावितरणला बसत आहे. नियमित वीज बिल भरण्याची ग्राहकांना सवय नाही, तिथे खासगी कंपन्यांना वितरणाची इच्छा नाही. फायदा असलेल्या भागात आम्ही आणि तोटा आहे, वसुली नाही, तो भाग महावितरणने सांभाळावा, याला स्पर्धा म्हणायचे? सध्या राज्यात  फायदेशीर मार्गांवर खासगी बस आणि जिथे फार नफा नाही, तिथे मात्र एसटी, असे चित्र आहे. परिणामी एसटीचा तोटा वाढत आहे. महावितरणचेही तेच होणार!

महावितरणला राज्यभरातून जेवढा महसूल मिळतो त्याच्या ६०-७० टक्के महसूल हा नवी मुंबई, भांडुप, कल्याण, पुणे येथून मिळतो. खासगी कंपन्या याच भागात समांतर परवान्यासाठी उत्सुक आहेत. कारण १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणारे घरगुती ग्राहक येथे आहेत. १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सवलतीचा दर लागू होतो. त्यांना ही वीज खरेदी दरापेक्षाही कमी दराने दिली जाते. खासगी कंपन्यांना तो भाग नको असण्यामागे ही मेख आहे. औरंगाबाद, नागपूर, जळगाव या जिल्ह्यांत वीज वितरणासाठी खासगी कंपन्या आल्या; पण ग्राहकांकडून वसुली होत नसल्याने त्यांनी माघार घेतली. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, ठाणे, पुणे याच भागांत खासगी कंपन्यांना रस आहे. शिवाय समांतर वितरण, म्हणजे एकाच भागात एकाहून अधिक कंपन्या.

एकदा शिरकाव केला की सरकारी कंपनीला संपवून टाकण्याचे प्रकार दूरसंचार क्षेत्रात दिसलेच आहेत.खासगीकरण होऊ देणार नाही, ऊर्जा नियामक आयोगाकडे ठाम भूमिका मांडू, हे आश्वासन हा चकवा आहे. विद्युत विनिमय २००३ कायदा व केंद्राच्या भूमिकेनुसार वीज वितरणासाठी समांतर परवाना थांबवण्याची शक्यता नाही. आयोगाला कायद्याने बांधील राहून असा परवाना द्यावा लागेल. महावितरणला सध्याइतके कर्मचारी लागणार नाहीत, त्यांना आपल्या सेवेत घेण्याचे बंधन खासगी कंपनीवर नाही. त्यामुळे काही काळाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची स्थिती बीएसएनएल, एमटीएनएलसारखी होऊ शकेल.  

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण