शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

...मग महाराजांचे नाव का घेता - शरद पवार

By admin | Updated: October 13, 2014 05:34 IST

सत्तेच्या हव्यासापोटी सध्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे

मुंबई : सत्तेच्या हव्यासापोटी सध्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे. पण त्याच भाजपाशासित गुजरात राज्यात सरकारच्या अधिकृत शालेय पुस्तकातून सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे आजोबा असल्याचा खोटा इतिहास शिकवून शिवाजी महाराजांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे चुकीचा इतिहास सांगणाऱ्या भाजपाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केली.मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने विधानसभा निवडणूक वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर शरद पवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चेत आम्ही काँग्रेस पक्षाकडे निम्म्या जागांची मागणी केली होती. तरीदेखील आम्ही १२५ ते १३० जागा मान्य करण्याच्या विचारात होतो. मात्र काँग्रेस पूर्वीपासूनच स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्यामुळे काँग्रेसने पहिल्यांदा आपली १३० जागांच्या उमेदवारांची यादी आमच्याशी कोणतीही चर्चा न करता प्रसिद्ध केली. तेव्हाच काँग्रेसची स्वतंत्र लढण्याची भूमिका स्पष्ट झाली. त्यामुळे आम्हाला देखील स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागला.महाराष्ट्र एकसंध राहावा ही भूमिका, पण जनमतही महत्त्वाचे पत्रकारांनी वेगळ््या विदर्भाबाबत शरद पवार यांना छेडले असता ते म्हणाले की, भाजपाने वेगळ््या विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यातून आता काढून टाकला आहे. असे असले तरी त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून वेगळ्या विदर्भाबाबत काय भूमिका आहे, हे त्यांनी लपवून ठेवलेले नाही. महाराष्ट्र एकसंघ राहावा, ही राष्ट्रवादीची आधीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी अनेकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत. एखाद्या भागाला वेगळे व्हावसे वाटत असेल, चार राजकीय नेत्यांनी सांगितलं म्हणून ते आम्ही मान्य करणार नाही. ज्या वेळी गोवा वेगळा होण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा लोकांचे मतदान घेण्याचे ठरवले गेले. त्या वेळी ४९.५ टक्के लोकांनी महाराष्ट्रात सामील होण्याची, तर ५०.५ टक्के लोकांनी वेगळ््या गोव्याची मागणी केली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्राने बहुमताचा कौल स्वीकारला होता. विदर्भाबाबत जर निर्णय घ्यायचा असेल, तर खाजगी संस्थेच्या माध्यमातून एक-दोन शहरांचा केलेला सर्व्हे आम्हाला मान्य नाही. प्रश्न हाताळायचा असेल तर निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण विदर्भातील जनमत चाचणी घ्या, असेही पवार यांनी सुचविले. (प्रतिनिधी)