शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

...तर नीतेश राणेंना फिरुदेणार नाही

By admin | Updated: October 19, 2015 23:41 IST

प्रमोद जठार : राणेंच्या वागण्यामुळे सिंधुदुर्गची इभ्रत चव्हाट्यावर

वैभववाडी : शिवसेना, भाजपा कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का दिला तरी आमदार नीतेश राणे यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा देत राणे आणि समर्थकांच्या वागण्यामुळे सुसंस्कृत सिंधुदुर्गची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे. ७0 वर्षीय वृद्ध सज्जनराव राणेंचा तुमच्या विरोधात आवाज उठतो. म्हणजे तुमचं सगळंच संपलंय. हे आता ओळखा, अशी टीका करतानाच नम्र रहाल तर मोठे व्हाल, असा सल्ला माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार राणे यांना दिला. येथील भाजपा कार्यालयात युतीची पत्रकार झाली. यावेळी प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, राजश्री धुमाळे, अशोक रावराणे, राजेंद्र राणे, शिशिर परुळेकर, मंगेश लोके, नंदू शिंदे आदी उपस्थित होते. जठार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील निवडणूका शांततेत पार पाडाव्यात ही आमची नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांना विनंती आहे. आता आमचे सरकार आहे त्यामुळे दहशतीची भाषा त्यांनी संपविण्याची गरज आहे. सत्तेवर असताना एस. टी. स्थानकाची जागा, उड्डाणपूल हे वैभववाडीचे प्रश्न ते का सोडवू शकले नाहीत? असा सवाल करीत राणेंच्या विकासाच्या थापांवर सिंधुदर्गातील जनता विश्वास ठेवणार नाही, असे स्पष्ट केले.प्रमोद जठार पुढे म्हणाले, एमआयडीसी प्रकल्प त्यांच्याच कृपेने बंद पडले आहेत. त्यामुळे युती सरकारच्या एक वर्षाच्या कारभारावर बोलण्याचा नारायण राणे यांना तिळमात्र अधिकार नाही. हे सर्व प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करून विकास कसा करतात ते आम्ही दाखवून देऊ.संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिपूर्ण विकासाचे वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग, विजयदुर्ग बंदर, सी वर्ल्ड, चिपीचे विमानतळ हे महत्त्वाचे प्रकल्प महायुतीचे सरकार पुर्ण करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करीत राणेंच्या पक्षातील प्रामाणिक आणि सज्जन लोक शिवसेना आणि भाजपात आले आहेत. त्यामुळे वैभववाडी नगरपंचायतीत पहिला नगराध्यक्ष महायुतीचाच बसेल. कणकवली नगरपंचायतीतही लवकरच हर्णे तुताऱ्यांचा बिगुल वाजलेला ऐकायला येईल, असेही शेवटी प्रमोद जठार म्हणाले. (प्रतिनिधी)राणे एक पैसाही देऊ शकले नाही : जठार माजी आमदार जठार म्हणाले की, २५ वर्षे सिंधुदुर्गचे नेतृत्व करताना नारायण राणे यांनी जे प्रकल्प आणले ते पूर्ण नव्हे तर काही सुरुही करु शकले नाहीत. राणेंच्या पेन्सील नोंदीमुळे चिपीचा प्रकल्प रखडला, लोकांना धमकावून जादा जमीन मिळवण्याच्या प्रयत्नात सी वर्ल्ड प्रकल्प अडकला, महामार्ग चौपदरीकरणाला एक पैसाही ते देवू शकले नाहीत, असेही जठार यांनी यावेळी सांगितले.