शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

...तर हमिद अन्सारींनी देश सोडून जावे, इंद्रेश कुमार यांची विखारी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 21:06 IST

देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी अन्सारींवर जोरदार टीका केली आहे.

नागपूर, दि. 12 - देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी अन्सारींवर जोरदार टीका केली आहे. देशातील मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य हमिद अन्सारी यांनी मागील आठवड्यात केले होते.

नागपुरात शनिवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे मुस्लिम महिलांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. हमिद अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कुणीही त्यांच्या समर्थनार्थ समोर आले नाही. देशातील अनेक भागांत मुस्लिमांनी त्यांचा विरोध केला. ते जेव्हा उपराष्ट्रपती होते तेव्हा भारतीय, धर्मनिरपेक्ष व सर्व पक्षांचे होते. मात्र खुर्चीवरून उतरत असताना ते सांप्रदायिक, कट्टरपंथी व कॉंग्रेसचे झाले. उपराष्ट्रपती असताना त्यांना कधी असुरक्षित असल्याचे वाटले नाही. मग आताच कसे काय वाटले, असा प्रश्न इंद्रेश कुमार यांनी उपस्थित केला. हमिद अन्सारी यांना सुरक्षित असा दुसरा देश सापडला तर तेथे स्थायिक होण्यास आम्ही त्यांची मदत करू. या मुद्यावर कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेदेखील ते म्हणाले.देशभरात ‘छोडो पीओके’ मोहीमपाकव्याप्त काश्मीरने पाकिस्तानला आपले मानलेले नाही. तेथे आजदेखील एकिकृत काश्मीर व भारताचे नारे लागतात. मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे ९ ते १४ आॅगस्ट या कालावधीत देशभरात ‘छोडो पीओके’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १४ आॅगस्ट रोजी देशभरात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात येईल. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या व गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या जम्मू काश्मीर विधिमंडळातील जागा निवडणूका किंवा नामनिर्देशनाच्या माध्यमातून भरण्यात याव्या, अशी त्यांनी मागणी केली. हिंसेपेक्षा संवादातून मार्ग काढण्यावर भर दिला पाहिजे, असेदेखील ते म्हणाले.कॉंग्रेसने स्वातंत्र्य नाही, फाळणी दिलीसंघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नव्हता, अशी टीका करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात त्यावेळी कॉंग्रेस ही एक चळवळ होती. देशासाठी लढणारे सर्व नागरिक त्या चळवळीत सहभागी झाले होते. त्यात स्वयंसेवकदेखील होते. आताचा कॉंग्रेस पक्ष व ती चळवळ यात प्रचंड फरक आहे. कॉंग्रेस पक्ष झाल्यावर त्याने देशाला स्वातंत्र्य दिले नाही तर देशाचे तुकडे करून फाळणी दिली. संघाच्या शाखांमध्ये अगोदरपासूनच तिरंगा फडकविण्यात येत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.चीन जगात एकटा पडलायचीनकडून भारताला वारंवार धमक्या देण्यात येत आहेत व संबंध खराब होतील, असे म्हणण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्र शासनाने डोकलामच्या मुद्यावर कणखर भूमिका घेतली आहे. जगात आपले अनेक मित्र आहे. मात्र चीनचा एकही मित्र नाही. कूटनीतीद्वारे आपण चीनला जगात एकटे पाडले आहे, असे प्रतिपादन इंद्रेश कुमार यांनी केले.