शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

...तर कादंबरीचा शेवट बदलावा लागेल!

By admin | Updated: October 4, 2015 02:54 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचे पूर्ण सत्य समोर आले, तर गरज वाटल्यास ‘महानायक’ या नेताजींच्या आयुष्यावरील कादंबरीचा शेवट बदलावा लागेल, असे या कादंबरीचे

नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचे पूर्ण सत्य समोर आले, तर गरज वाटल्यास ‘महानायक’ या नेताजींच्या आयुष्यावरील कादंबरीचा शेवट बदलावा लागेल, असे या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवरून देशात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेताजींशी संबंधित ६४ गोपनीय फाइल्स खुल्या केल्याने तिला आणखी जोर आला आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे आजवर मानले जात होते; मात्र हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला होता. नेताजींनी शत्रूला हुलकावणी देण्यासाठी तेव्हा स्वत:च्या मृत्यूची आवई उठवल्याचे अनेकांचे मत होते. ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच खुल्या केलेल्या फाइल्समधूनही नेताजी सन १९४५ नंतरही जिवंत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. लेखक विश्वास पाटील यांनी सुमारे आठ ते नऊ वर्षे सखोल संशोधन करून तेरा वर्षांपूर्वी नेताजी सुभाषबाबूंच्या संघर्षमय आयुष्यावर ‘महानायक’ ही कादंबरी लिहिली असून, ती बरीच गाजली आहे. नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातातच झाल्याचे शिक्कामोर्तब पाटील यांनी आपल्या कादंबरीतून केले होते. नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे अत्यंत तपशीलवार विवेचन त्यांनी ‘महानायक’मध्ये केले आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनीदेखील नेताजींच्या मृत्यूचे गूढ वाढत असल्याचे विधान केले होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘सुभाषबाबूंविषयी गोपनीय माहिती असलेल्या ६४ फाइल्स ममता बॅनर्जी यांनी खुल्या केल्या असल्या, तरी अद्याप बरीच माहिती जगासमोर यायची आहे. नेताजींबाबतचे पूर्ण सत्य समोर आले आणि ते कादंबरीत केलेल्या वर्णनापेक्षा वेगळे असले, तर कादंबरीचा शेवट बदलला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)