शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

...तर कादंबरीचा शेवट बदलावा लागेल!

By admin | Updated: October 4, 2015 02:54 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचे पूर्ण सत्य समोर आले, तर गरज वाटल्यास ‘महानायक’ या नेताजींच्या आयुष्यावरील कादंबरीचा शेवट बदलावा लागेल, असे या कादंबरीचे

नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचे पूर्ण सत्य समोर आले, तर गरज वाटल्यास ‘महानायक’ या नेताजींच्या आयुष्यावरील कादंबरीचा शेवट बदलावा लागेल, असे या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवरून देशात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेताजींशी संबंधित ६४ गोपनीय फाइल्स खुल्या केल्याने तिला आणखी जोर आला आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे आजवर मानले जात होते; मात्र हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला होता. नेताजींनी शत्रूला हुलकावणी देण्यासाठी तेव्हा स्वत:च्या मृत्यूची आवई उठवल्याचे अनेकांचे मत होते. ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच खुल्या केलेल्या फाइल्समधूनही नेताजी सन १९४५ नंतरही जिवंत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. लेखक विश्वास पाटील यांनी सुमारे आठ ते नऊ वर्षे सखोल संशोधन करून तेरा वर्षांपूर्वी नेताजी सुभाषबाबूंच्या संघर्षमय आयुष्यावर ‘महानायक’ ही कादंबरी लिहिली असून, ती बरीच गाजली आहे. नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातातच झाल्याचे शिक्कामोर्तब पाटील यांनी आपल्या कादंबरीतून केले होते. नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे अत्यंत तपशीलवार विवेचन त्यांनी ‘महानायक’मध्ये केले आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनीदेखील नेताजींच्या मृत्यूचे गूढ वाढत असल्याचे विधान केले होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘सुभाषबाबूंविषयी गोपनीय माहिती असलेल्या ६४ फाइल्स ममता बॅनर्जी यांनी खुल्या केल्या असल्या, तरी अद्याप बरीच माहिती जगासमोर यायची आहे. नेताजींबाबतचे पूर्ण सत्य समोर आले आणि ते कादंबरीत केलेल्या वर्णनापेक्षा वेगळे असले, तर कादंबरीचा शेवट बदलला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)