शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

...तर बारावीला अपात्र

By admin | Updated: July 23, 2016 01:28 IST

इयत्ता अकरावीला आॅफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे.

पुणे : इयत्ता अकरावीला आॅफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे. सर्व प्रवेश आॅनलाइनच होणार असून आॅफलाइन प्रवेश बेकायदेशीर असतील, असे विभागीय शिक्षण उपसंचालक व प्रवेश समितीचे अध्यक्ष दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अद्याप अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश समितीने स्वतंत्रपणे आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.आॅनलाइन अर्ज केलेल्या ७३ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १४२ विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीअखेर प्रवेश अ‍ॅलॉट करण्यात आलेले नाहीत. तसेच ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार २४४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्याबाबत टेमकर व इतर अधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामुळे उर्वरित प्रवेशही आॅनलाइन घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात आॅफलाइन प्रवेश दिला जाणार नाही. असे झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांस बारावीच्या परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात येईल. राज्य मंडळास इयत्ता अकरावीमध्ये आॅनलाइन पद्धतीने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती कळविली जाईल. तसेच अकरावी व बारावीची कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता आॅनलाइन पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येवरच अवलंबून राहणार आहे, असे टेमकर यांनी स्पष्ट केले आहे.>अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक१. दि. २७ जुलै (सायं. ५ वाजता) : अ‍ॅलॉट करूनही प्रवेश न घेतलेले (नॉट रिपोर्टेड) विद्यार्थ्यांनी पुन्हा कॉलेज अ‍ॅलॉट झाल्याचा संदेश संकेतस्थळाच्या होमपेजवर आॅनलाइन अर्ज क्रमांक टाकून पाहणे.२. दि. २८ जुलै (सकाळी ११ ते ४) आणि दि. २९ जुलै (सकाळी १० ते १२) : अ‍ॅलॉट झालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेणे व महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन अपडेट करणे.३. दि. २९ जुलै : ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत, अर्धवट अर्ज भरले आहेत, तसेच चारही फेऱ्यांमध्ये अ‍ॅलोकेशन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचव्या फेरी घेतली जाईल. त्याची सविस्तर कार्यपद्धती २९ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. ३ (अ). दि. ३० जुलै ते २ आॅगस्ट : फक्त नवीन विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज सादर करणे. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्याने भाग-१ व भाग-२ पूर्ण करून आॅनलाइन सबमिट करणे.३ (ब). दि. ४ आॅगस्ट : गुणवत्ता यादी जाहीर करणे३ (क). दि. ५ व ६ आॅगस्ट : संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे४. दि. ७ आॅगस्ट : ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळाले आहे, शाखा, माध्यम चुकीचे निवडले आहे, शाखा बदल करायवयाचा आहे, प्राधान्यक्रम चुकला आहे, जुलै २०१६ मध्ये झालेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांच्यासाठी विशेष आॅनलाइन फेरीचे आयोजन करण्याबाबत सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध केली जाईल. (याकरिता नव्याने नोंदणी व नव्याने शुल्क भरणे आवश्यक).४ (अ). दि. ९ ते १३ आॅगस्ट : पहिली विशेष फेरी४ (ब). दि. १२ ते २३ आॅगस्ट : दुसरी विशेष फेरी ४ (क). दि. २५ ते ३० आॅगस्ट : तिसरी विशेष फेरी >आॅफलाइन प्रवेशाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील. तसेच आॅफलाइन प्रवेश आढळल्यास उच्च न्यायालयाचा अवमान समजून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, - दिनकर टेमकर, विभागीय शिक्षण उपसंचालक