शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

'तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं असतं, परंतु...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 09:42 IST

Sharad Pawar News: Shiv Sena मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने राजकीय पेच निर्माण झाल्यावर पंतप्रधान Narendra Modi यांनी BJP आणि NCPने आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी माझ्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र मी त्याला नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीबाबत नवनवे गौप्यस्फोट अजूनही होत असतात. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीतून शिवसेनेला आघाडीत आणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांनी तेव्हाच्या घडामोडींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने राजकीय पेच निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपा आणि राष्ट्रवादीने आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी माझ्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र मी त्याला नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रशाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामधील मतभेद वाढू लागले होते.शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचार मोदींच्या मनात आला असावा. त्या पार्श्वभूमीवर माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशीच इच्छा होती. मात्र मी पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन हे शक्य नाही, याची कल्पना मोदींना दिली. तेव्हा अजूनही विचार करा, असा सल्ला मोदींनी दिला. मात्र मी ठामपणे नकार दिला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. भाजपा शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नव्हता. त्यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, अचानक शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर काही दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता, अशीची चर्चा सुरू होती. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, त्या शपथविधीसाठी मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवल्याची चर्चा नेहमीच होत अशते. मात्र मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी सरकारच स्थापन केलं असतं. त्यांनी अर्धवट काम केलं नसतं, मी अजित पवार यांना फडवणीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी पाठवलं होतं या चर्चेला काहीच अर्थ नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगतलं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा