शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं असतं, परंतु...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 09:42 IST

Sharad Pawar News: Shiv Sena मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने राजकीय पेच निर्माण झाल्यावर पंतप्रधान Narendra Modi यांनी BJP आणि NCPने आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी माझ्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र मी त्याला नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीबाबत नवनवे गौप्यस्फोट अजूनही होत असतात. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीतून शिवसेनेला आघाडीत आणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांनी तेव्हाच्या घडामोडींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने राजकीय पेच निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीभाजपा आणि राष्ट्रवादीने आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी माझ्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र मी त्याला नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रशाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामधील मतभेद वाढू लागले होते.शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचार मोदींच्या मनात आला असावा. त्या पार्श्वभूमीवर माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशीच इच्छा होती. मात्र मी पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन हे शक्य नाही, याची कल्पना मोदींना दिली. तेव्हा अजूनही विचार करा, असा सल्ला मोदींनी दिला. मात्र मी ठामपणे नकार दिला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. भाजपा शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नव्हता. त्यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, अचानक शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर काही दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता, अशीची चर्चा सुरू होती. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, त्या शपथविधीसाठी मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवल्याची चर्चा नेहमीच होत अशते. मात्र मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी सरकारच स्थापन केलं असतं. त्यांनी अर्धवट काम केलं नसतं, मी अजित पवार यांना फडवणीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी पाठवलं होतं या चर्चेला काहीच अर्थ नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगतलं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा