शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

‘त्यांची’ दिवाळी साजरी होणार नवीन घरांत

By admin | Updated: October 18, 2016 03:35 IST

कचोरे आणि डोंबिवली,इंदिरानगर परिसरातील बीएसयूपीच्या प्रकल्पात लवकरच २९२ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याने त्यांची दिवाळी नवीन घरांत साजरी होणार आहे

कल्याण : कचोरे आणि डोंबिवली,इंदिरानगर परिसरातील बीएसयूपीच्या प्रकल्पात लवकरच २९२ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याने त्यांची दिवाळी नवीन घरांत साजरी होणार आहे.दिवाळीपूर्वी या नव्या सदनिकांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. केडीएमसी क्षेत्रातील शहरी गरिबांना घरकुले बांधून देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा हा बीएसयूपी प्रकल्प १०८ कोटी २७ लाखांचा असून त्यामध्ये केंद्रशासनाचे ४७ कोटी ५३ लाख, तर राज्यशासनाचे ३५ कोटी ५४ लाखांचे अनुदान आहे. याआधी केंद्राने ३० कोटी ५८ लाखांचे अनुदान दिले होते. परंतु, कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने केंद्र शासनाने उर्वरित १७ कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. त्यातच घोटाळ्यांच्या आरोपाने हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने हा प्रकल्प मार्गी लागेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. दरम्यान, जून महिन्यात आयुक्त ई. रवींद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्राच्या नगरविकास विभागाचे सचिव अध्यक्ष असलेल्या सेंट्रल मॉनिटरिंग कमिटीसमोर बीएसयूपीच्या कामांचे सादरीकरण केले होते. त्यामुळे कामाला गती आली आणि केंद्राकडून १७ कोटींचे रोखलेले अनुदान प्राप्त झाले. आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेता ८ हजार १८८ सदनिकांपैकी ४८१ सदनिका बांधून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. कचोरे येथील १०८२ आणि कल्याणच्या इंदिरानगरमधील ३३० अशा एकूण १४१२ सदनिका तयार आहेत, तर उर्वरित ६ हजार २९५ सदनिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. २००९ मध्ये इंदिरानगर येथील बीएसयूपी प्रकल्पाचे काम सुरू झाले. करारानुसार हे काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते. परंतु, २०१६ उजाडले तरी मूळ लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळालेला नव्हता. आता याठिकाणच्या ३ इमारती बांधून झाल्याने १४० लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहेत. घरभाड्याच्या मुद्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या माने यांनी न्यायालयात धाव घेतली होती. लाभार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कचोरे येथील प्रकल्पामध्येदेखील १५२ लाभार्थ्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यापूर्वी याठिकाणी १५२ लाभार्थ्यांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>त्यांना घरांचा ताबा महिन्यानंतरविशेष बाब म्हणजे कल्याणमधील आधारवाडी परिसरातील साठेनगरवासीयांनादेखील लवकरच घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेथील आतापर्यंत पात्र ठरलेल्या ३९ जणांचे उंबर्डे येथील घरांमध्ये पुनर्वसन केले जाणार असून दिवाळीपूर्वी चाव्यांचे वाटप केले जाणार असले तरी इमारतींच्या लिफ्टला एनओसी न मिळाल्याने महिनाभरानंतर त्यांना घरे ताब्यात मिळतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता जोशी यांनी दिली.