शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

‘शासन आपल्या दारी’चे मूल्य आता तीन कोटींवर; जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 06:42 IST

या कार्यक्रमाचा खर्च ५२.९० कोटींवर पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तहसील कार्यालयापासून ते भूमिअभिलेखपर्यंतची सर्व कामे एक खिडकी योजनेंतर्गत एकाच कार्यक्रमात व्हावीत यासाठी सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ योजना आणण्यात आली. भव्य कार्यक्रम, भव्य सभामंडप, भव्य व्यासपीठ या तामझामासह हा कार्यक्रम जिल्ह्याजिल्ह्यांत पार पडतो. सरकारच थेट जनतेच्या दारात पोहोचत असल्यामुळे आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता या योजनेच्या खर्चातही वाढ करण्यात आली आहे. नियोजन विभागाकडून या उपक्रमाची खर्च मर्यादा थेट एक कोटीवरून तीन कोटी इतकी करण्यात आली आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहतात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा लोकाभिमुख कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू नये याची काळजी सरकारकडून घेण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याआधी एक कोटीची खर्चमर्यादा आता थेट तीन कोटीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नाशिकमधील कार्यक्रमासाठी अलीकडेच एसटीने महिलांना आणण्यासाठीचा खर्च ५५ लाखांवर पोहोचला.  याव्यतिरिक्त जेवण, मंडप, सिटीलिंक बस यांचा खर्च एक कोटीच्या मर्यादित निधीत कसा भागवायचा हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना पडला. त्यानंतर नियोजन विभागाने ही मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला.

होणारी कामे...

शिधापत्रिका, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न, जातीचा, नॉन क्रिमिलियर दाखला, मतदार नोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती याबरोबरच संजय गांधी योजना, सलोखा योजना, कन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचे लाभ या योजनेमार्फत थेट लोकांपर्यंत पोहोचवले जातात.

आतापर्यंत ५२ कोटी

या कार्यक्रमाचा खर्च ५२.९० कोटींवर पोहोचला आहे. सरकारकडूनच ही आकडेवारी पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. खर्च मर्यादा वाढल्याने आता हा खर्च शेकडो कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र