शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

जे सत्य ते लोकांसमोर आणलं पाहिजे, जातीपातीचं राजकारण...; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 16:55 IST

महाराष्ट्र म्हणजे शिवाजी, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती अशी ओळख आहे. तुम्ही वेगळी ओळख करायला जाता आणि घोटाळा होतो असं जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना सुनावलं.

ठाणे - जातपात, धर्म कुठल्या पॅरामिटरमध्ये मोजले जातात हेच कळत नाही. शिवाजी महाराजांबद्दल पहिलं आक्षेपार्ह लिखाण २००३ मध्ये आले. जेम्स लेननं महाराजांच्या पितृत्त्वावर शंका घेतली. त्यावर आम्ही बोलायचं नाही का? तुम्ही जाऊन ज्यांनी ही माहिती दिली होती त्यांची माफी मागितली होती. त्यांनी आमच्या महाराजांची बदनामी करायची आणि तुम्ही त्यांची बाजू घ्यायची याला जातपात म्हणतात असं सांगत जितेंद्र आव्हाडांनीराज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी मराठा नाही, मागासवर्गीय आहे. मराठा हा शब्द महाराष्ट्राची ओळख आहे. पुरंदरे हे कांदबरीकार आहेत इतिहासकार नाही असं आम्ही बोललो त्यांच्याबाजूने तुम्ही बोलला. हर हर महादेव सिनेमातील दृश्यावर आक्षेप घेतला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर पाणी टाकलं. बाजीप्रभू देशपांडे हे महाराजांच्या तुलनेत होते. त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला दाखवलं. तुम्ही या सिनेमाला पाठिंबा दिला. मग कोण करतंय जातीपातीचं राजकारण? जे सत्य आहे ते लोकांसमोर आणले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुम्ही ज्या चित्रपटावर डोक्यावर घेतलं त्याला राज्यातील जनतेने नाकारलं. पूर्वीची लोक इतिहास वाचत नव्हती. कारण त्यांना शाळेतच जाऊ दिले जात नव्हते. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा साठेंना शाळेत बसू दिले नव्हते. राज्यातील ९० टक्के बहुजन समाजाची दुसरी पिढी आता शिकतेय. त्यांना आधीचा इतिहास माहिती नव्हता. छत्रपतींचा विचार हाच शाहू, फुले आंबेडकर विचार आहे. कर्मकांडाला छत्रपतींनी थारा दिली नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर आलेला विचार शाहू, फुले आंबेडकरांनी समाजात नेला. महिलांची शाळा, अस्पृशांचा लढा, शिक्षण हे समोर आले. म्हणून चवदार तळ्याचं आंदोलन महाडला का घेतले कारण समोर रायगड आहे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्र म्हणजे शिवाजी, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती अशी ओळख आहे. तुम्ही वेगळी ओळख करायला जाता आणि घोटाळा होतो. जेम्स लेनला पाठिंबा देऊन वाद कुणी निर्माण केला? जातीपातीचं राजकारण बोलण्यापुरतं असते. पुरंदरेंनी चुकीचा इतिहास लिहिला हे आजही बोलतो. बहुजनांना शाळा नव्हती. त्यांनी इतिहास वाचला नव्हता. महाराष्ट्रातला बहुजन ८० टक्के आहे. तुमचा जातीवाद पाहा असंही राज ठाकरेंना आव्हाडांनी बजावलं. 

आम्हीही सिनेमा काढणार आहोतजेम्स लेनच्या पुस्तकात ज्यांची नावे होती त्यांनी जबाबदारी होती. छत्रपतींबाबत चुकीचं छापून न येणे, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चूक पसरवणे योग्य नाही. ते महान देशपांडे जे आहेत त्यांनी पुरावे घेऊन यावेत. आम्हीही चित्रपट बनवतोय. त्यावर जयसिंग पवार, इंद्रजित सावंत यांच्याकडून तपासून शिक्का घेणार आहोत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRaj Thackerayराज ठाकरे