शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

सूर्य आग ओकणार! मुंबईचा पारादेखील चढाच; तापमान ३४ अंशांवर, उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 06:22 IST

एप्रिलच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे मुंबईसह राज्यात उन्हाचा जोर आणखी वाढतच असून, आता तर पुढील चार दिवस हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत.

मुंबई :

एप्रिलच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे मुंबईसह राज्यात उन्हाचा जोर आणखी वाढतच असून, आता तर पुढील चार दिवस हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत. हवामान खात्याकडील माहितीनुसार, १० ते १२ एप्रिलदरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईचा पारादेखील चढाच असून, कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. परिणामी वाढत्या उन्हासह उकाड्यातदेखील कमालीची वाढ झाली असून, नागरिक अक्षरश: होरपळून निघत आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. पुढील चार दिवसांसाठी राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, बिहार आणि झारखंड या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढराज्यातील उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, ही संख्या ९२ झाली आहे. आतापर्यंत ८ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात २०२० - २०२१ या वर्षात उष्माघाताने ४३ जणांचा बळी  घेतला होता. त्यापूर्वी २०१६ साली १९, २०१७ साली १३ आणि २०१८ मध्ये  दोन मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, येत्या काळात राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटांचा इशारा असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

उष्माघात म्हणजे वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. शरीरातील पाणी जसजसे कमी होते, तसतसे वेगवेगळे परिणाम यात दिसून येतात. त्यानुसार याचे काही उपप्रकार पडतात. पण, याला सरसकटपणे उष्माघात असेच म्हटले जाते. शरीराचे अंतर्गत तापमान मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाच्या भागाद्वारे होते. थंडीमध्ये हायपोथॅलॅमसकडून जाणाऱ्या संदेशामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्वचेची घर्मरंध्रे बंद होतात, परिणामी कुडकुडणे सुरू होते आणि शरीरातील उष्णता कायम राखली जाते. याउलट उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्यावर शरीराचे बाह्य तापमानही वाढते.  बाह्य उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला ‘हीट स्ट्रेस’ किंवा उष्णता तणाव म्हणतात, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

कुठे येईल लाट?९ ते १२ एप्रिल : झारखंड, बिहार१० ते १२ एप्रिल : विदर्भ

 ९ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान    कोरडे राहील. १० एप्रिलकोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.११ आणि १२ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMumbaiमुंबई