शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

सूर्य आग ओकणार! मुंबईचा पारादेखील चढाच; तापमान ३४ अंशांवर, उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 06:22 IST

एप्रिलच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे मुंबईसह राज्यात उन्हाचा जोर आणखी वाढतच असून, आता तर पुढील चार दिवस हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत.

मुंबई :

एप्रिलच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे मुंबईसह राज्यात उन्हाचा जोर आणखी वाढतच असून, आता तर पुढील चार दिवस हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत. हवामान खात्याकडील माहितीनुसार, १० ते १२ एप्रिलदरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईचा पारादेखील चढाच असून, कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. परिणामी वाढत्या उन्हासह उकाड्यातदेखील कमालीची वाढ झाली असून, नागरिक अक्षरश: होरपळून निघत आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. पुढील चार दिवसांसाठी राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, बिहार आणि झारखंड या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढराज्यातील उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, ही संख्या ९२ झाली आहे. आतापर्यंत ८ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात २०२० - २०२१ या वर्षात उष्माघाताने ४३ जणांचा बळी  घेतला होता. त्यापूर्वी २०१६ साली १९, २०१७ साली १३ आणि २०१८ मध्ये  दोन मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, येत्या काळात राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटांचा इशारा असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

उष्माघात म्हणजे वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. शरीरातील पाणी जसजसे कमी होते, तसतसे वेगवेगळे परिणाम यात दिसून येतात. त्यानुसार याचे काही उपप्रकार पडतात. पण, याला सरसकटपणे उष्माघात असेच म्हटले जाते. शरीराचे अंतर्गत तापमान मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाच्या भागाद्वारे होते. थंडीमध्ये हायपोथॅलॅमसकडून जाणाऱ्या संदेशामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्वचेची घर्मरंध्रे बंद होतात, परिणामी कुडकुडणे सुरू होते आणि शरीरातील उष्णता कायम राखली जाते. याउलट उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्यावर शरीराचे बाह्य तापमानही वाढते.  बाह्य उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला ‘हीट स्ट्रेस’ किंवा उष्णता तणाव म्हणतात, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

कुठे येईल लाट?९ ते १२ एप्रिल : झारखंड, बिहार१० ते १२ एप्रिल : विदर्भ

 ९ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान    कोरडे राहील. १० एप्रिलकोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.११ आणि १२ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMumbaiमुंबई