शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

जिल्हा परिषदेपाठोपाठ पशुसंवर्धन विभागातील भरती रद्द, राज्य सरकारने जारी केला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 08:41 IST

२०१७ आणि २०१९ मध्ये जाहीर झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय

दीपक भातुसे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकीकडे ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली असतानाच दुसरीकडे यापूर्वी जाहीर केलेल्या आणि जाहीरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागवलेल्या भरती प्रक्रिया रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. यापूर्वी १३ हजार ५२१ पदांची जिल्हा परिषदेची भरती सरकारने रद्द केली होती. मंगळवारी पशुसंवर्धन विभागाची २०१७ आणि २०१९ मध्ये जाहीर झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय विभागाने जारी केला आहे.

पशुसंवर्धन आयुक्तलांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आधी २०१७ आणि नंतर मार्च २०१९ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पशुवसंर्धन विभागातील ७२३ पदांसाठी ही जाहीरात काढण्यात आली होती. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. पैसे भरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही भरले. मात्र त्यानंतर आजपर्यंत मागील चार वर्ष या उमेदवारांच्या वाट्याला प्रतिक्षेशिवाय काहीच आले नाही. अखेर जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाने ही भरतीही रद्द केली.

ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती होणार?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाकरता पदभरतीवरील निर्बंधांमध्ये राज्य सरकारने शिथिलता दिली आहे. ही शिथिलता १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू आहे. त्यामुळे ही शिथिलता संपण्याच्या मुदतीच्या आत म्हणजेच ऑगस्ट २०२३ पूर्वी या पदांची भरतीची कार्यवाही करण्याच्या सूचना सरकारने पशुसंवर्धन आयुक्तांना दिल्या आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र