शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुराने वारणाकाठची रया गेली; पिके कुजून मोठे नुकसान झाले; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 10:18 IST

वारणाकाठ सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो

लोकमत न्यूज नेटवर्क, किणी: महापुरामुळे वारणा नदीकाठचे ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग आदी पिके अक्षरश: कुजून गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. वारणाकाठ सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी  चांगल्या पद्धतीने ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, भाजीपाला पिकवतात; मात्र  दर एक-दोन वर्षाने महापुराचा फटका बसत  असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यावर्षीही आलेल्या महापुराचे पाणी तब्बल आठ दिवस शेतामध्ये राहिल्याने  हातातोंडाशी आलेली पिके अक्षरश: कुजून गेली आहेत. 

सोयाबीनच्या केवळ काटक्या, उसाची चिपाडे शिल्लक राहिली आहेत. घातलेले पैसे बुडाले असून कुजलेले पीक  काढून शेत रिकामे करण्यासाठी खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.  वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने शेती करणे अवघड बनले असल्याने तातडीने पंचनामे करून  नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. पुलासाठी टाकलेले भराव यामुळे महापुराची तीव्रता वाढत आहे. याबाबत उपापयोजना करण्याची मागणी होत आहे.

महापुराचा फटका वारंवार बसत आहे. यावर्षी  तब्बल दहा दिवस शेतामध्ये पाणी राहिल्याने पिके कुजून गेल्याने  मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. -महावीर कोले, शेतकरी

टॅग्स :riverनदी