शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

परतीच्या पावसाचे वेध सप्टेंबर अखेरीसच; आजही पाऊस, ऑरेंज अलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 06:41 IST

कोकण किनारीपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शनिवारीदेखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मुंबई - मुंबईला पावसाचा मारा शनिवारीदेखील कायम राहणार असून, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार या दोन जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे कोकण किनारीपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शनिवारीदेखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

कोकण, विदर्भ वगळता, मराठवाड्यात आठवडाभर तर मध्य महाराष्ट्रात १८ सप्टेंबरपासून पुढील ५ दिवस म्हणजे २३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. असे असले तरी मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्ह्यांत मात्र जोरदार पडत असलेल्या पावसाचे सातत्य व शक्यता कायम आहे. मान्सून परतीच्या पावसाचे वेध येत्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाची तीव्रता टिकून राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Rainपाऊस