शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 20:16 IST

आठवले म्हणाले, "मी नुकताच देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी, त्याचा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला 10-20 जागा द्या, अशी आमची मागणी नव्हती. चार-पाच जागा द्याव्यात, अशीच आमची मागणी होती...

महायुतीच्या जागावाटपात आरपीआय नेते रामदास आठवले अद्यापही वेटिंगवरच असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात बोलताना आठवले यांनी एका बाजूला नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, तसेच धारावी किंवा चेंबूरच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलावे लागेल, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत, असे सांगितले असल्याचे, म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवसच शिल्लक उरले आहेत. 

आठवले म्हणाले, "मी नुकताच देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी, त्याचा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला 10-20 जागा द्या, अशी आमची मागणी नव्हती. चार-पाच जागा द्याव्यात, अशीच आमची मागणी होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघांनाही रिपब्लिकन मतांचा फायदा होणार आहे. असे असतानाही महायुतीच्या नेत्यांनी गांभीर्याने आमचा विचार केला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आमची यादी त्यांना दिली होती आणि कोणता तरी थोडासा त्याग करणे त्यांनी आवश्यक होते. आम्ही जर एवढा त्याग करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास होतो आहे, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणआवर चांगल्या पद्धतीचे काम चालली आहे. म्हणून महायुतीसोबत राहायला हवे, अशी आमची भूमिका आहे. आम्ही प्रामाणिकपणे महायुतीसोबत आहोत. असे असतानाही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते मुंबईत एबीपी माझासोबत बोलत होते.

मुंबईतील एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू -रिपब्लिकन पक्षाला एक जनाधार आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी माझ्यासोबत आहे. पण आता मी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर, त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, असे त्यांनी सांगितले आहे. यानंतर आणखी एक-दोन तरी जागा मिळाव्या, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला आहे. त्यात धारावी किंवा चेंबूरची जी जागा आहे, ती आम्हाला देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. यासंदर्भात, मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितेल.

फडणवीस यांच्याकडे आठवले यांच्या मागण्या... -याशिवाय, आम्ही फडणवीसांकडे मागणी केली आहे की, "दोन जागा विधानसभेच्या. एक एमएलसी, सरकार आल्यानंतर दोन-तीन महामंडळांची अध्यक्षपदे, तीन-चार उपाध्यक्षपदे, तसेच जिल्हा तालुक्यातील ज्या सरकारी समित्या आहेत त्यांत रिपब्लिकन पक्षाला रिप्रेझेंटेशन मिळायला हवे." याशिवाय, "आगामी महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, त्यांतही रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्यायला हव्यात." अशी मागणीही रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ramdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा