शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

"एकच गोष्ट चांगली होऊ शकते, ती म्हणजे..."; शिंदे, केसरकरांना जयंत पाटलांचे किल्ल्यावरून उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:10 IST

Rajkot fort News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले आहे. राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानांना जयंत पाटलांनी उत्तर दिले.

Jayant Patil Rajkot Fort News Marathi: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून राजकारणात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

"सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली पाहिजे. बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे", अशी मागणी जयंत पाटील यांनी राजकोट किल्ल्यावरील आंदोलनावेळी महायुती सरकारला लक्ष्य केले.  

'एक झाड पडले नाही, पुतळा पडला', जयंत पाटलांचा उलट सवाल

ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने पुतळा पडला असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, "दुर्दैव आहे की, अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करत आहेत. ४५ प्रति किमी वेगाने वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. अहो, त्या दिवशी ४८ किमी वेगाने वारे वाहत होते. एकही झाड या भागात पडले नाही. पुतळा पडला."

"ज्या बाजूने वारे येत होते, त्याच बाजूने पडला. या सगळ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महाराष्ट्र सरकारची आहे. एकनाथ शिंदेंची आहे. या राज्याच्या बांधकाम मंत्र्‍यांची आहे. स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे", असे जयंत पाटील म्हणाले.  

जयंत पाटलांचा केसरकरांवर पलटवार 

"या भागातील मंत्री म्हणतात की काहीतरी चांगले घडायचे असेल... हो, एकच गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली होऊ शकते, ती म्हणजे महायुतीचे सरकार महाराष्ट्रातील जनता गाडून देईन आणि पुन्हा एकदा जनतेचे राज्य आणण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया", असे म्हणत जयंत पाटलांनी दीपक केसरकरांना उत्तर दिले.  

राजकोट किल्ल्यावरील राड्यावर जयंत पाटील म्हणाले...

"छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत जी दुर्घटना घडली, तिथे गेलो. त्याठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणातही नव्हता. ही दुःखद घटना आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येणार होती. पण, दुर्दैवाने झाला तो प्रकार हा निषेधार्ह आहे. लोकशाही ऐवजी झुंडशाही महाराष्ट्रात निर्माण करणे. लोकांमध्ये भय निर्माण करणे, हे महाराष्ट्रावर सत्ता असणारी लोक करणार आहेत. महाराष्ट्रातील जनता झालेल्या दुर्घटनेचा जाब या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा जयंत पाटलांनी दिला.

टॅग्स :RaigadरायगडJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Politicsराजकारण