शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

"एकच गोष्ट चांगली होऊ शकते, ती म्हणजे..."; शिंदे, केसरकरांना जयंत पाटलांचे किल्ल्यावरून उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:10 IST

Rajkot fort News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले आहे. राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानांना जयंत पाटलांनी उत्तर दिले.

Jayant Patil Rajkot Fort News Marathi: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून राजकारणात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

"सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली पाहिजे. बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे", अशी मागणी जयंत पाटील यांनी राजकोट किल्ल्यावरील आंदोलनावेळी महायुती सरकारला लक्ष्य केले.  

'एक झाड पडले नाही, पुतळा पडला', जयंत पाटलांचा उलट सवाल

ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने पुतळा पडला असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, "दुर्दैव आहे की, अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करत आहेत. ४५ प्रति किमी वेगाने वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. अहो, त्या दिवशी ४८ किमी वेगाने वारे वाहत होते. एकही झाड या भागात पडले नाही. पुतळा पडला."

"ज्या बाजूने वारे येत होते, त्याच बाजूने पडला. या सगळ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महाराष्ट्र सरकारची आहे. एकनाथ शिंदेंची आहे. या राज्याच्या बांधकाम मंत्र्‍यांची आहे. स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे", असे जयंत पाटील म्हणाले.  

जयंत पाटलांचा केसरकरांवर पलटवार 

"या भागातील मंत्री म्हणतात की काहीतरी चांगले घडायचे असेल... हो, एकच गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली होऊ शकते, ती म्हणजे महायुतीचे सरकार महाराष्ट्रातील जनता गाडून देईन आणि पुन्हा एकदा जनतेचे राज्य आणण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया", असे म्हणत जयंत पाटलांनी दीपक केसरकरांना उत्तर दिले.  

राजकोट किल्ल्यावरील राड्यावर जयंत पाटील म्हणाले...

"छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत जी दुर्घटना घडली, तिथे गेलो. त्याठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणातही नव्हता. ही दुःखद घटना आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येणार होती. पण, दुर्दैवाने झाला तो प्रकार हा निषेधार्ह आहे. लोकशाही ऐवजी झुंडशाही महाराष्ट्रात निर्माण करणे. लोकांमध्ये भय निर्माण करणे, हे महाराष्ट्रावर सत्ता असणारी लोक करणार आहेत. महाराष्ट्रातील जनता झालेल्या दुर्घटनेचा जाब या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा जयंत पाटलांनी दिला.

टॅग्स :RaigadरायगडJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Politicsराजकारण