शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पुन्हा एकदा प्रतिसरकार स्थापन करण्याची आवश्यकता, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:02 IST

कुंडल येथे क्रांतिअग्रणी पुरस्काराचे वितरण : मराठीचा अभिमान बाळगा

कुंडल : आजचे राजकारण पाहता लोकांची डोकीच चालत नाहीत आणि आपलंही डोकं ठिकाणावर नाही. त्यामुळे आपण त्यांना पाहतोय आणि प्रमाण मानतो, असं आजचे राजकारण बघताना जाणवते आहे. आजचे राजकीय वातावरण जे हास्यास्पद झाले आहे. यासाठी या मातीतून लोक पुढे येऊन पुन्हा एकदा प्रतिसरकार स्थापन करण्याची गरज आहे, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त क्रांतिअग्रणी पुरस्कार डॉ. नेमाडे यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड हे अध्यक्षस्थानी होते. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे होते.डॉ. नेमाडे म्हणाले, क्रांतीच्या या भूमीत अनेक प्रकारचे क्रांतिकारक आहेत. सर्वच क्षेत्रात या परिसराने क्रांती केली आहे. याच भूमीत जी. डी. बापू जन्मले आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार घेताना मला अभिमान वाटतो. या भागात नावीन्याची ओढ दिसून येते. जे होऊन गेले ते वैचारिक लोक इथ घडले कारण हे विचार या मातीत जन्मजात आहेत. आजच्या राजकारणात हाच विचार मागे पडला आहे. या परिसराने मला खूप मोठ्ठं देणं दिलं आहे. भवानराव पंतप्रतिनिधी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. यातून या परिसराचे जे आजवर कोणाच्या पाहण्यात आले नसलेले पैलूही पुढे येतील.

आजही दारिद्र्य रस्त्यावर लोटांगण घालत असताना राजकीय लोक अनाठायी लाखोंचा खर्च करत आहेत, हे पाहून मी नेहमी अस्वस्थ होतो. आपल्याला मुळाकडे जाण्याची वृत्ती नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटत आहेत. यामुळे आपलं मूळ नष्ट होत आहे. मराठी ही भाषा अभिजात असताना आपल्या भाषेकडे दुर्लक्ष होते आहे. तिला "महाराष्ट्री" म्हटले जायचे ही भाषा संस्कृतपेक्षा ही जुनी आहे. मराठी भाषेतील बहुतांश काव्य हे महिलांनी लिहिले. इंग्रजी माध्यमातील कोणताही विद्यार्थी पुढे इंग्रजीचा प्राध्यापक होत नाही. जे प्राध्यापक आहेत ते मराठी किंवा इतर माध्यमात शिकलेले आहेत. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगा, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.अरुण लाड म्हणाले, चळवळीतून जे समाज घडवतात. त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आजवर कोणाही राजकारण्यांना किंवा सामाजिक भूमिका सोडणाऱ्यांना हा पुरस्कार दिला गेला नाही.यावेळी ॲड. प्रकाश लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, उद्योजक उदय लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, सत्याविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, पी. पी. कुंभार, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या धनश्री लाड, आदी उपस्थित होते. 

नेमाडे हे उत्कृष्ट कवी : जब्बार पटेलक्रांतिसिंह नाना पाटील व जी. डी. बापूंच्या नावाने उभारलेले स्मारक प्रत्येकाने पाहिले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते, तर आजचा आधुनिक महाराष्ट्र घडला नसता. भालचंद्र नेमाडे हे अभूतपूर्व समुद्र आहे. त्यामध्ये उडी मारली पाहिजे. नेमाडे यांनी कवितेतून स्त्रियांविषयी कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. नेमाडे हे उत्कृष्ट कवी आहेत. अशी त्यांची नव्याने ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षा जब्बार पटेल यांनी भाषणात व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार