शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर!

By रवी टाले | Updated: June 29, 2025 06:24 IST

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत.

रवी टाले कार्यकारी संपादक, अकाेला

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत. यावर्षी त्याचा पुन्हा प्रत्यय आला. मान्सूनच्या नेहमीपेक्षा लवकर आगमनाचा अपवाद वगळता, इतर बहुतांश अंदाज, ‘अलर्ट’ चुकीचे ठरले आहेत. मुळात प्रारंभीचा पाऊस मान्सूनचा की मान्सूनपूर्वचा, अशीही शंका उपस्थित होत आहे. त्यातच राज्यातील आतापर्यंतचे पावसाचे चित्र अत्यंत विषम आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये जलसाठा नेहमीपेक्षा लवकर वाढू लागला आहे. राज्यातील २,९९७ धरणांमधील सरासरी पाणीसाठा जूनच्या तिसऱ्या आठवड्यास प्रारंभ होतानाच ४० टक्क्यांच्या घरात पोहोचला होता. नाशिक जिल्ह्यात जूनमधील २३ दिवसांत ३१५ मिलिमीटर पाऊस पडला असून, गंगापूर आणि दारणा धरणांमधील पाणीसाठा सुमारे ४३ टक्के झाला आहे. काही धरणे तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. सर्वाधिक जलसाठा कोकणात झाला आहे.

दुसरीकडे, मराठवाडा, विदर्भात पावसाची प्रचंड तूट आहे. जूनच्या पहिल्या २० दिवसांतील आकडेवारीनुसार, विदर्भात ५७ टक्के, तर मराठवाड्यात ३९ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. महाराष्ट्रातील किमान २० जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा तुटवडा आहे. पुणे जिल्ह्यात जून संपण्यापूर्वीच जूनच्या सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातील सरासरी पावसाची आकडेवारी २४८.८ मिमी एवढी दिसत आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ती सामान्यतः ११८.५ मिमी एवढीच असते. यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात किती विषम प्रमाणात पाऊस झाला, हे या आकडेवारीवरून लक्षात येते.

पावसाच्या तुटीमुळे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी चिंताक्रांत आहेत. दोन्ही विभागांतील काही जिल्ह्यांत २५ जूनपासून पावसाचे आगमन झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.

जे शेतकरी पेरण्यांसाठी पावसाची वाट बघत होते, त्यांची प्रतीक्षा संपली, तर पेरणी उरकलेल्या शेतकऱ्यांची दुबार पेरणीची चिंता दूर झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र परिस्थिती गंभीरच आहे.

राज्यातील धरणांमधील जलसाठ्याची स्थितीही पावसाच्या विषमतेकडे अंगुलीनिर्देश करत आहे. जोरदार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये जलसाठा लक्षणीयरीत्या वाढला आहे.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील २,९९७ धरणांत एकूण साठा जवळपास ४० टक्के एवढा आहे; मात्र त्यामध्ये मोठी असमानता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणात एका दिवसातच पाच हजार दशलक्ष घनफूट जलसाठा वाढला होता, तर विदर्भ-मराठवाड्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये भर पावसाळ्यात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. जून संपण्याच्या बेतात असताना राज्यात पाण्याचे ६०४ टँकर सुरू आहेत!

तज्ज्ञांच्या मते, नैऋत्य मोसमी पाऊस भारताकडे वाहून आणणाऱ्या सोमाली जेट स्ट्रीमचा जोर यावर्षी जास्त असल्याने आणि २० मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, मान्सूनने केरळ ते महाराष्ट्र हा प्रवास दोनच दिवसांत पूर्ण केला.

बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो उत्तर-पश्चिमेकडे वक्राकार प्रवास करू लागला, की कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवरील जिल्ह्यांत पाऊस होतो.

बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य किंवा दक्षिणेकडील भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो भारतीय द्वीपकल्पाच्या दिशेने पश्चिमेकडे प्रवास करू लागला, की विदर्भात पाऊस पडतो.

यावर्षी जूनमध्ये पहिली स्थिती निर्माण झाल्याने कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत चांगला पाऊस झाला, तर दुसरी स्थिती निर्माण न झाल्याने विदर्भ कोरडाच राहिला! दोन्ही स्थितींचा थोडा थोडा लाभ पदरात पडणाऱ्या मराठवाड्याच्या नशिबीही विदर्भाचेच भोग आले.

गत काही वर्षांतील मान्सूनच्या वाढत्या लहरीपणासाठी प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल हे घटकही कारणीभूत आहेत. त्यावर उपाययोजना हा कोण्या एका देशाच्या आवाक्यातील विषय नाही. त्यामुळे आहे ती वस्तुस्थिती स्वीकारून, आपल्या पातळीवर शक्य ते उपाय शोधत पुढे जाण्याला पर्याय नाही.

मान्सूनचा लहरीपणा यापुढेही असाच कायम राहणार असल्याचे मान्य करून, शेतकऱ्यांनीही पीक पद्धतीत, वेळापत्रकात बदल करणे, नवीन वाण आणि तंत्रज्ञान अंगीकारणे, आणीबाणीच्या स्थितीत किमान पिके जगवण्याएवढी सिंचनाची सोय करणे गरजेचे झाले आहे.

वर्षभर पाऊस होणाऱ्या देशांच्या तुलनेत भारतासारख्या मोसमी पावसाच्या देशात हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे कठीण असते. तरी शक्य तेवढा बरोबर अंदाज वर्तविण्यासाठी भारत सरकारने हवामान खात्यामध्ये गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे.

संशोधनाला चालना देण्यासोबतच, केवळ हवामान क्षेत्रासाठी काम करणारे कृत्रिम उपग्रह आणि महासंगणकांची संख्या वाढवायला हवी.

निसर्गावर मात करणे मनुष्याला कधीच जमणार नाही; पण कितीही संकटे आली तरी, त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे, हा मनुष्यधर्म आहे. त्याला जागत या संकटालाही सामोरे जावेच लागेल!