शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

मंत्रालयातील टेलिफोनची ट्रिंग-ट्रिंग थांबली; ८० टक्के फोन ८ दिवसांपासून पडलेत बंद

By दीपक भातुसे | Updated: August 15, 2024 12:55 IST

संपर्क करणे झाले अवघड, कर्मचाऱ्यांची पायपीट

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संपूर्ण राज्याचा प्रशासकीय कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील ८० टक्के दूरध्वनी आठ दिवसांपासून बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंत्रालयातील दूरध्वनीवर बाहेरून फोन येणे बंद आहे, तर मंत्रालयातून फोन केला तर समोरील व्यक्तीचा आवाजच ऐकायला येत नाही. विविध विभागांनी एमटीएनएलकडे तक्रार  केली. मात्र,  तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून बोळवण करण्यात आल्याचे समजते.

संपर्क करणे झाले अवघड

मंत्रालयातील विविध विभागांत संपर्क करायचा असेल तर अधिकारी, कर्मचारी दूरध्वनीचा वापर करतात, कारणविभागांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी त्यांच्याकडे असते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात त्यामुळे संबंधित विभागात संपर्क करायचा तर अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक असूनही उपयोग नसतो. त्यामुळे दूरध्वनीवरच संपर्क करणे सोपे जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून कोणत्याही विभागात संपर्क करणे अधिकारी, कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे. 

कर्मचाऱ्यांची पायपीट

अनेकदा एखाद्या विभागातून काही माहिती मागवायची असेल, फाईल मागवायची असेल, एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर दूरध्वनी बंद असल्याने थेट त्या विभागात जावे लागत आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचारीही त्रासले आहेत. याशिवाय मंत्रालयाच्या बाहेर आणि संपूर्ण राज्यातून प्रशासकीय यंत्रणेला मंत्रालयातील विविध विभागांत दूरध्वनीद्वारे संपर्क करणे अवघड झाले आहे.

तेव्हा गाडी पाठवावी लागली

यापूर्वी एकदा मुख्यमंत्री कार्यालयातील दूरध्वनी बंद झाले होते, तेव्हा गाडी पाठवून एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयात आणून दूरध्वनी दुरुस्त करून घेतले होते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMTNLएमटीएनएल