शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मंत्रालयातील टेलिफोनची ट्रिंग-ट्रिंग थांबली; ८० टक्के फोन ८ दिवसांपासून पडलेत बंद

By दीपक भातुसे | Updated: August 15, 2024 12:55 IST

संपर्क करणे झाले अवघड, कर्मचाऱ्यांची पायपीट

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संपूर्ण राज्याचा प्रशासकीय कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील ८० टक्के दूरध्वनी आठ दिवसांपासून बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंत्रालयातील दूरध्वनीवर बाहेरून फोन येणे बंद आहे, तर मंत्रालयातून फोन केला तर समोरील व्यक्तीचा आवाजच ऐकायला येत नाही. विविध विभागांनी एमटीएनएलकडे तक्रार  केली. मात्र,  तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून बोळवण करण्यात आल्याचे समजते.

संपर्क करणे झाले अवघड

मंत्रालयातील विविध विभागांत संपर्क करायचा असेल तर अधिकारी, कर्मचारी दूरध्वनीचा वापर करतात, कारणविभागांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी त्यांच्याकडे असते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात त्यामुळे संबंधित विभागात संपर्क करायचा तर अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक असूनही उपयोग नसतो. त्यामुळे दूरध्वनीवरच संपर्क करणे सोपे जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून कोणत्याही विभागात संपर्क करणे अधिकारी, कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे. 

कर्मचाऱ्यांची पायपीट

अनेकदा एखाद्या विभागातून काही माहिती मागवायची असेल, फाईल मागवायची असेल, एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर दूरध्वनी बंद असल्याने थेट त्या विभागात जावे लागत आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचारीही त्रासले आहेत. याशिवाय मंत्रालयाच्या बाहेर आणि संपूर्ण राज्यातून प्रशासकीय यंत्रणेला मंत्रालयातील विविध विभागांत दूरध्वनीद्वारे संपर्क करणे अवघड झाले आहे.

तेव्हा गाडी पाठवावी लागली

यापूर्वी एकदा मुख्यमंत्री कार्यालयातील दूरध्वनी बंद झाले होते, तेव्हा गाडी पाठवून एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयात आणून दूरध्वनी दुरुस्त करून घेतले होते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMTNLएमटीएनएल