नागपूर : निवडणुकीत जास्तीत जास्त संधी मिळावी, असे कार्यकर्त्यांना वाटत असते; परंतु महायुती एकत्रित लढत आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांत फार नाराजी आहे असे कुठलेही चित्र नाही. आमच्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. विकासोन्मुख व पारदर्शी शासन आणण्यासाठीच आम्ही महायुतीचा निर्णय घेतला आहे. मुंबईत भाजपचा नव्हे, तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिका नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत विविध दावे करण्यात येत आहेत. मात्र, केवळ जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला राहणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ५५ जागांची भाजपने मागणी केलेली नाही. तेथे केवळ शिवसेना व भाजप हेच प्रमुख जागा आल्या होत्या. आम्ही आपापसांत बसून जागावाटप करू, असे मुख्यमंत्र्यांनी पक्ष आहेत. मागील वेळी भाजपच्या ४२ स्पष्ट केले.
एकाच घरातील पाच जण पीएच.डी. करत शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वक्तव्य केले होते. शासनाने ही योजना हुशार मुलांसाठी सुरू केली आहे. एका घरातील पाच लोक योजनेचा लाभघेतील, तर इतर घरांतील गरजू व होतकरू तरुणांना त्याचा लाभ मिळणार नाही. अजित पवार यांचे बोलणे रास्त आहे, असे फडणवीस म्हणाले.
झोपडपट्टी पट्टे वाटपासाठी राज्यभरात 'नागपूर मॉडेल'
झोपडपट्टीतील लोकांना पट्टे वाटप झाले पाहिजे, ही मागील ३० ते ४० वर्षापासून मागणी होती. २०१४ नंतर आम्ही यासाठी पुढाकार घेतला होता. २०१९ नंतर ही प्रक्रिया थांबवली गेली होती. सत्तेवर परत आल्यावर सगळ्या प्रकारच्या जमिनीवर पट्टे वाटप करता येईल, असा निर्णय आम्ही घेतला. झुडुपी जंगलावर वसलेल्यांना मालकी हक्काचे पट्टे देत आहोत. त्याचे नागपूर मॉडेल तयार केले आहे. त्याला संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे. एमएमआर रिजन वगळता बाकी सर्व झोपडपट्ट्यांना हा शासन निर्णय लागू असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना हेच कामधंदे राहिले का?
संजय राऊत यांनी शासनावर केलेल्या टीकेबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया देण्याचेच कामधंदे राहिलेत का? असा सवाल केला. कोण काय बोलतो त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मुख्यमंत्री आहे का? मुख्यमंत्र्यांना एवढेच कामधंदे राहिले का? आमच्या पातळीचे असेल तर आम्ही उत्तरे देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : CM Fadnavis asserts MahaYuti will win Mumbai's mayor election. Seat sharing among alliance partners will be decided amicably. Nagpur model for slum land distribution to be implemented statewide, excluding MMR region.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस का दावा है कि मुंबई में महायुति का महापौर होगा। गठबंधन सहयोगियों के बीच सीटों का बंटवारा सौहार्दपूर्ण ढंग से किया जाएगा। झुग्गी भूमि वितरण के लिए नागपुर मॉडल राज्यव्यापी लागू किया जाएगा, एमएमआर क्षेत्र को छोड़कर।