शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:38 IST

ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो असं सावरकरांच्या नातवानं म्हटलं.

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील विधानामुळे राज्यात सध्या राहुल गांधींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधींच्या विधानावरून हा वाद निर्माण झाला आहे. राजकीय स्वार्थापोटी राहुल गांधींनी हे विधान केले असून ते बेजबाबदार आहेत. सावरकरांची बदनामी केल्यावर हिंदुत्ववादी गटाला बॅकफूटवर जावं लागेल असं त्यांना वाटलं असाव. परंतु या विधानामुळे हिंदुत्ववादी, सावरकर प्रेमी सगळ्या संघटना पेटून उठल्या आहेत. यातून सावरकर अभ्यासक तयार होणार असून या वादातून त्यांना स्फूर्ती मिळेल आणि आणखी अभ्यास करून सावरकर जगासमोर मांडतील याचा आनंद असल्याचं सावरकराचे नातू सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे. 

सात्यकी सावरकर म्हणाले की, राहुल गांधींनी दाखवलेली पत्रे ही खरी आहेत परंतु त्याला माफीनामा म्हणणं अयोग्य आहे. ती निवेदनं आहेत. सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांना एका कोठडीत ठेवले होते. कुठल्याही सुविधा नव्हत्या. सामान्य बंदीवानाच्या सुविधा मला मिळाव्यात यासाठी त्यांनी अर्ज केले होते. माझ्यासोबत जितके क्रांतीकारी आहेत त्यांची सुटका करा असंही पत्रे लिहिले होते. सावरकरांना १९२९ साली महिना ६० रुपये निर्वाह भत्ता सुरू झाला. ती पेन्शन नव्हती. असे निर्वाह भत्ते काँग्रेस नेत्यांनाही मिळत होते. नुकतेच गांधीजींचेही समोर आले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो. गांधींचे वारसदार सतत गरळ ओकत आहे. सावरकरांच्या विचारधारेला विरोध करा पण बदनामी करू नका. राहुल गांधी, तुषार गांधी सातत्याने सावरकरांची बदनामी करतात. आम्ही कधीही गांधींजींची बदनामी केली नाही. राहुल गांधींचे विधान कुणालाही चीड आणणारी आहे. सावरकरांचे वैचारिक विरोधक तेदेखील या विधानाला पाठिंबा दिला नाही. विरोधक असो वा समर्थक कुणीही राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा देणार नाही असंही सात्यकी सावरकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, राजकीय लाभापोटी शिवसेना ठाकरे गट काँग्रेससोबत आहे. सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी कुठलीही मागणी कुटुंबियांनी केलेली नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यातच मला माझी संपत्ती मिळाली असं सावरकर म्हणाले होते. सावरकरांना विरोध असेल तर करा परंतु बदनामी करू नका अशी मागणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस