शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:38 IST

ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो असं सावरकरांच्या नातवानं म्हटलं.

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील विधानामुळे राज्यात सध्या राहुल गांधींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधींच्या विधानावरून हा वाद निर्माण झाला आहे. राजकीय स्वार्थापोटी राहुल गांधींनी हे विधान केले असून ते बेजबाबदार आहेत. सावरकरांची बदनामी केल्यावर हिंदुत्ववादी गटाला बॅकफूटवर जावं लागेल असं त्यांना वाटलं असाव. परंतु या विधानामुळे हिंदुत्ववादी, सावरकर प्रेमी सगळ्या संघटना पेटून उठल्या आहेत. यातून सावरकर अभ्यासक तयार होणार असून या वादातून त्यांना स्फूर्ती मिळेल आणि आणखी अभ्यास करून सावरकर जगासमोर मांडतील याचा आनंद असल्याचं सावरकराचे नातू सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे. 

सात्यकी सावरकर म्हणाले की, राहुल गांधींनी दाखवलेली पत्रे ही खरी आहेत परंतु त्याला माफीनामा म्हणणं अयोग्य आहे. ती निवेदनं आहेत. सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांना एका कोठडीत ठेवले होते. कुठल्याही सुविधा नव्हत्या. सामान्य बंदीवानाच्या सुविधा मला मिळाव्यात यासाठी त्यांनी अर्ज केले होते. माझ्यासोबत जितके क्रांतीकारी आहेत त्यांची सुटका करा असंही पत्रे लिहिले होते. सावरकरांना १९२९ साली महिना ६० रुपये निर्वाह भत्ता सुरू झाला. ती पेन्शन नव्हती. असे निर्वाह भत्ते काँग्रेस नेत्यांनाही मिळत होते. नुकतेच गांधीजींचेही समोर आले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो. गांधींचे वारसदार सतत गरळ ओकत आहे. सावरकरांच्या विचारधारेला विरोध करा पण बदनामी करू नका. राहुल गांधी, तुषार गांधी सातत्याने सावरकरांची बदनामी करतात. आम्ही कधीही गांधींजींची बदनामी केली नाही. राहुल गांधींचे विधान कुणालाही चीड आणणारी आहे. सावरकरांचे वैचारिक विरोधक तेदेखील या विधानाला पाठिंबा दिला नाही. विरोधक असो वा समर्थक कुणीही राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा देणार नाही असंही सात्यकी सावरकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, राजकीय लाभापोटी शिवसेना ठाकरे गट काँग्रेससोबत आहे. सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी कुठलीही मागणी कुटुंबियांनी केलेली नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यातच मला माझी संपत्ती मिळाली असं सावरकर म्हणाले होते. सावरकरांना विरोध असेल तर करा परंतु बदनामी करू नका अशी मागणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस