शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही; 'सरसकट' शब्दावर नारायण राणेंचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:14 IST

ज्यांना जातीबद्दल, समाजाबद्दल इतिहासाची जाण आहे अशांनीच या विषयावर बोलावे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

मुंबई – गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी १ महिन्याचा कालावधी दिला आहे. मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी अनेक वर्ष जुनी आहे. यापूर्वी मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु कोर्टात ही बाब न्यायप्रविष्ट आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केली आहे. परंतु सरसकट असं करू नका, राज्य सरकारने घटनेतील कलम १५-४, १६-४ याचा अभ्यास करावा. सामाजिक, शैक्षणिक आणि मागासलेले यांना आरक्षण द्यावे. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, सरकारने सरसकट याचा उल्लेख करण्यापेक्षा समाजातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सर्व्हे करावा. राज्यातील जवळपास ३८ टक्के मराठा समाज आहे. जे गरीब आहेत, पैशाअभावी शिक्षण नाही, अशा मराठा समाजातील वर्गाला आरक्षण द्यावे. इतर जातीचे आरक्षण काढून आम्हाला द्यावे असं नाही. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू देऊ नका. घटनेच्या तरतुदीप्रमाणे राज्य सरकारने मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिले होते. ते आरक्षण देण्यात यावे अशी मागणी राणेंनी केली.

त्याचसोबत ज्यांना जातीबद्दल, समाजाबद्दल इतिहासाची जाण आहे अशांनीच या विषयावर बोलावे. मागणाऱ्यांवर राग करू नये. मराठा समाज आरक्षण मागतोय. यापूर्वी आरक्षणाची मागणी ज्या ज्या वेळी झाली तेव्हा राज्यात मराठा मुख्यमंत्री होते. मराठ्यांनी दुसऱ्याला आरक्षण देताना द्वेष केला नाही त्यामुळे आता मराठा समाज आरक्षण मागताना इतरांनी द्वेष करू नये असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNarayan Raneनारायण राणे