शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Devendra Fadanvis: "महाराष्ट्राच्या 'मी पुन्हा येईन'प्रमाणेच नड्डांची घोषणा; आम्हीच येऊ, फक्त आम्हीच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 18:15 IST

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून बिहारमधील सत्तांतरावर भाष्य करत नितीश कुमार यांना आगे बढो.. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई - उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देंवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभेतील शेवटच्या अधिवेशनात बोलताना मी पुन्हा येईन ही कविता म्हणून दाखवली होती. मात्र, या कवितेनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. मी पुन्हा येईन हे वाक्य महाराष्ट्रात फडणवीसांशी जोडले गेले. मी पुन्हा येईन हा फडणवीसांना विश्वास वाटत होता, पण विरोधकांनी तो त्यांचा अहंकार असल्याचं म्हटलं. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच नव्हते. त्यावरुनही त्यांना ट्रोल केलं गेलं. आता फडणवीसांची मी पुन्हा येईन ही घोषणा आणि जेपी नड्डा यांची आम्हीच येऊ ही घोषणा एकसारखीच असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून बिहारमधील सत्तांतरावर भाष्य करत नितीश कुमार यांना आगे बढो.. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यात, बिहारमधील भाजपच्या मेळाव्यात भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेलं विधान देशभर चर्चेत होतं. त्या विधानापासूनच नितीशकुमार यांनी उचल खाल्ली आणि इतर पक्षांना संपवायला निघालेल्या भाजपला सत्तेतून हद्दपार केलं असे शिवसेनेनं म्हटलं आहे. यावेळी, फडणवीसांच्या मी पुन्हा येईन, या विधानाची आठवण सांगत, नड्डा यांची घोषणाही मी पुन्हा येईनसारखीच असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. 

''बिहारमध्ये सध्या तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या बरोबरीने सरकार बनवलं आहे. ही आघाडी 2024 मध्ये अशीच भक्कम राहिली तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात, हे सत्य आहे. महाराष्ट्रातील 'मी पुन्हा येईन' या घोषणेप्रमाणेच श्री. नड्डा यांची 'आम्हीच येऊ, फक्त आम्हीच' ही घोषणा आहे. लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने कोणीही येऊ शकेल, पण आम्हीच येऊ असे सांगणारे लोकशाही मानतात काय?, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला विचारण्यात आला आहे. 

सुशील मोदींनी शिंदे गटाचा दावाच खोडला

बिहारमधील भाजपचे नेते सुशील मोदी आता बरळले आहेत की, 'शिवसेना आम्ही फोडली. जे आमच्याबरोबर राहणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील. शिवसेनेला ते भोगावे लागले.' याचा काय अर्थ घ्यायचा? शिंदे गट सांगतोय त्यावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार. आम्ही हिंदुत्व किंवा स्वाभिमानासाठी बाहेर पडलो हा दावाच सुशील मोदी यांनी खोडून काढला. शिंदे गट शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी फोडला हे त्यांनी जाहीर केल्यावर सगळय़ांचेच वस्त्रहरण झाले! पण आता त्यांच्याच बिहारमध्ये नितीश कुमार भाजपपासून दूर झाले. त्यावर काय बोलणार आहात?

राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो

शिवसेनेप्रमाणे नितीश कुमारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तेव्हा कुमारांनी उलटा तुम्हालाच डंख मारला हेच सत्य आहे. नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. 'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आले नाही. प्रत्येकाला सिंहासनावरून कधी तरी उतरायचे आहे. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है! 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना