शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

भावी लाडकी बहीण शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडतेय नदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:19 IST

विकासकामांचा निधी कुठे जातो; संतप्त नागरिकांचा सवाल 

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा तलवाडा महालपाडा येथे विद्यार्थी व गावपाड्यातील नागरिकांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. परिणामी त्यांना नदीवरील कच्च्या लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नदी ओलांडून जीव मुठीत घेऊन जावे लागते. मात्र, पावसाळ्यात या नदीला नेहमीच पूर येतो, त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तेथे लाकडी पूल तयार केला आहे, मात्र हा पूल कमकुवत असून, येथे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गावकऱ्यांनाही शहरात येण्यासाठी हाच मार्ग असल्याने त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे जिल्ह्यातील विकासकामांसाठी काेटींच्या निधीची तरतूद करण्यात येते, मात्र तो निधी कुठे वापरला जातो, असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

...अन्यथा आंदोलन केले जाईलमहालपाडा येथे जास्त प्रमाणात आदिवासी कातकरी बांधव वास्तव्य करतात. कातकरी समाजासाठी शासनाच्या मोठ्या प्रमाणात योजना आहेत, मात्र आजही कातकरी समाजाला जीवघेणा प्रवास करावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल.- विलास वांगड, आदिवासी अस्मिता संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष.