शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

भावी लाडकी बहीण शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडतेय नदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:19 IST

विकासकामांचा निधी कुठे जातो; संतप्त नागरिकांचा सवाल 

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा तलवाडा महालपाडा येथे विद्यार्थी व गावपाड्यातील नागरिकांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. परिणामी त्यांना नदीवरील कच्च्या लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नदी ओलांडून जीव मुठीत घेऊन जावे लागते. मात्र, पावसाळ्यात या नदीला नेहमीच पूर येतो, त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तेथे लाकडी पूल तयार केला आहे, मात्र हा पूल कमकुवत असून, येथे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गावकऱ्यांनाही शहरात येण्यासाठी हाच मार्ग असल्याने त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे जिल्ह्यातील विकासकामांसाठी काेटींच्या निधीची तरतूद करण्यात येते, मात्र तो निधी कुठे वापरला जातो, असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

...अन्यथा आंदोलन केले जाईलमहालपाडा येथे जास्त प्रमाणात आदिवासी कातकरी बांधव वास्तव्य करतात. कातकरी समाजासाठी शासनाच्या मोठ्या प्रमाणात योजना आहेत, मात्र आजही कातकरी समाजाला जीवघेणा प्रवास करावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल.- विलास वांगड, आदिवासी अस्मिता संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष.