शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

भावी लाडकी बहीण शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडतेय नदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:19 IST

विकासकामांचा निधी कुठे जातो; संतप्त नागरिकांचा सवाल 

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा तलवाडा महालपाडा येथे विद्यार्थी व गावपाड्यातील नागरिकांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. परिणामी त्यांना नदीवरील कच्च्या लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नदी ओलांडून जीव मुठीत घेऊन जावे लागते. मात्र, पावसाळ्यात या नदीला नेहमीच पूर येतो, त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तेथे लाकडी पूल तयार केला आहे, मात्र हा पूल कमकुवत असून, येथे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गावकऱ्यांनाही शहरात येण्यासाठी हाच मार्ग असल्याने त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे जिल्ह्यातील विकासकामांसाठी काेटींच्या निधीची तरतूद करण्यात येते, मात्र तो निधी कुठे वापरला जातो, असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

...अन्यथा आंदोलन केले जाईलमहालपाडा येथे जास्त प्रमाणात आदिवासी कातकरी बांधव वास्तव्य करतात. कातकरी समाजासाठी शासनाच्या मोठ्या प्रमाणात योजना आहेत, मात्र आजही कातकरी समाजाला जीवघेणा प्रवास करावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल.- विलास वांगड, आदिवासी अस्मिता संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष.