शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 06:26 IST

काही महिन्यांपूर्वीच एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किमीचा मार्ग सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणे आता शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा ७६ किमी लांबीचा टप्पा येत्या ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नियोजन केले असून एका पुलाची उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्गावर अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत यातील बोगद्यांची आणि रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम अद्याप बाकी आहे. प्रत्येक बाजूच्या वाहतुकीसाठी चार लेनचा हा पूल आहे. हा पूल ८२ मीटर उंच असून त्यावर गर्डर स्पॅन उभारण्याचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. हे काम अवघड असल्याने पुलाच्या उभारणीसाठी ऑक्टोबर उजाडणार आहे. मात्र त्याआधी ऑगस्टपर्यंत या पुलाची एक बाजू उभारण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे. त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत शेवटच्या टप्प्यातील ९७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वीच एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किमीचा मार्ग सुरू केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहचत आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ