शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

भारत जोडो यात्रेच्या धास्तीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली, काँग्रेसचा हल्लाबोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2022 15:58 IST

जर कोरोना वाढीची जर भीती वाटत असेल तर सक्षमपणे उपाययोजना करण्याऐवजी राहुल गांधींच्या यात्रेवरच बंदी का असा सवालही प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी विचारला आहे . 

मुंबई :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून या यात्रेत अडथळे निर्माण करण्याचे काम भाजपाने पहिल्या दिवसापासून केले. भाजपाच्या अपप्रचाराला जनतेने भीक न घालता पदयात्रेला मोठा पाठिंबा दिला. पदयात्रा आता दिल्लीच्या जवळ आल्याने भाजपाला जास्तच धडकी भरली आहे. या भीतीपोटीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी पदयात्रेत कोरोना प्रोटोकॉल पाळा अन्यथा पदयात्रा थांबवावी लागेल, असे धमकीचे पत्र पाठवले आहे, पण ही यात्रा कोणीही थांबवू शकत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटले आहे. 

भारत जोडो यात्रेमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असून पदायात्रेत मास्क घालणे, अंतर ठेवणे, पदयात्रेतील सहभागी लोकांना विलगीकरणात ठेवणे अशा प्रकारचे कोरोनाचे सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे अन्यथा जनहित लक्षात घेऊन ही पदयात्रा थांबवावी लागेल असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देऊन भाजपा व मोदी सरकार भारत जोडो यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाने घाबरले आहे, हेच दाखवून दिले. कोरोनाचा आता देशात फारसा प्रभाव राहिलेला नाही, देशभरातील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरु आहेत, असे प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले.

नुकत्याच्या पार पडलेल्या गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या, रोड शो केले. यावेळी कोरोनाचे कोणते प्रोटोकॉल पाळले होते? त्यावेळी असे पत्र पाठवण्याची सुबुद्धी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना का झाली नाही? जर कोरोना वाढीची जर भीती वाटत असेल तर सक्षमपणे उपाययोजना करण्याऐवजी राहुल गांधींच्या यात्रेवरच बंदी का असा सवालही प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी विचारला आहे . 

याचबरोबर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात कोरोनाचे दररोज हजारो रुग्ण आढळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंश्चिम बंगाल, पंजाबसह पाच राज्यात झालेल्या निवडणुकीतही अनेक जाहीर सभा घेतल्या. त्यावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळला होता? भाजपाच्या सभा व रोड शो अथवा गर्दीचे कार्यक्रम असले की कोरोना पळून जातो का? आणि फक्त विरोधी पक्षांच्या कार्यक्रमातच कोरोना येतो का? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना एवढीच कोरोनाची चिंता असती तर देशात कोरोनाचे लाखो बळी हकनाक गेले नसते, असे प्रा. काकासाहेब कुलकर्णी म्हणाले. 

कोरोना काळात झोपा काढलेले मोदी सरकार व आरोग्य मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत. तसेच, आरोग्य मंत्र्यांनी नरेंद्र मोदी व भाजपा नेत्यांना असे धमकीचे पत्र पाठवून दाखवावे. तसेच तात्काळ आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर निर्बंध आणावेत. भाजपाने कितीही अडथळे आणले तरी भारत जोडो यात्रा काश्मीरपर्यंत जाणारच व श्रीनगरमध्ये भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकवणार. ही पदयात्रा आता कोणीही रोखू शकणार नाही व भाजपा सरकारने तशी जबरदस्ती केलीच तर जनता त्यांना योग्य धडा शिकवेल हे लक्षात ठेवावे असेही प्रा. काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपा