शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

इतिहास बदलण्याची ताकद एकनाथ शिंदे गटात नाही; शिवसेना खा. संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 10:42 IST

शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत असं संजय राऊत म्हणाले.

 मुंबई - ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही. ज्यांना भाजपाचा पुळका होता ते पराभूत झाले. शिंदे-भाजपा सरकारला लोकशाहीची भीती आहे. बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केली आहे. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना फटकारलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान आहे. तुम्ही शिवसेना सोडली आहे. शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. स्वत:च्या हिमतीवर निवडून या. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. शिवसेनेच्या पंखाखाली का येताय? जर स्वाभिमानासाठी बाहेर पडलाय तर शिवसेनेशिवाय स्वतंत्र्य स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका. ज्यांची हकालपट्टी करण्यात आली ते शिवसेना-भाजपा युती असताना पराभूत झाले आहेत त्यांना आता भाजपाचा पुळका आला आहे असा टोला राऊतांनी लगावला. 

तसेच बंडखोरांच्या नेत्यांना असे बोलावे लागते. शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे. इतके दिवस मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. एक दुजे के लिए असा सिनेमा राजकारणात सुरू आहे. त्या सिनेमाचा शेवट कसा झाला सगळ्यांना माहिती आहे असंही संजय राऊत म्हणाले. 

संसदीय लोकशाहीवर हल्ला संसदीय लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. लोकशाहीची भीती सरकारला वाटत असेल तर ते देशासाठी घातक आहे. संसदेत परखड शब्दात बोलण्यावर बंदी आणली जात आहे. जर मुस्कुटदाबी करणार असेल तर देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल. लोकशाहीत गळा घोटण्याचं काम केले जात आहे. सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पंख छाटण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे असा आरोप संजय राऊतांनी केंद्र सरकारवर लावला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे