शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:19 IST

गेल्या १० वर्षापासून ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. राज्यातील विविध कोर्टात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ईडी जाणीवपूर्वक कारवाई करत नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

औरंगाबाद - देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ईडी या तपास संस्थेलाच नोटीस बजावण्याचा प्रकार औरंगाबादेत घडला आहे. पुण्याचे MIT चे कराड यांनी संपत्ती लपवल्याचा आरोप त्यांच्याच नातेवाईकांनी तक्रार केली. परंतु ईडी त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

याचिकाकर्त्यांचे वकील हिंमतसिंह देशमुख म्हणाले की, ईडी ही देशाची निष्पक्ष संस्था आहे. ईडीला पुरक असे मनी लॉन्ड्रिंग कायद्यात सर्व अधिकार देण्यात आले आहेत. परंतु पुरावे आणि आवश्यक गोष्टी पुरवूनही ईडीकडून काही ठराविक कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे लातूरचे विनायक श्रीपती कराड यांनी ईडीविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल हायकोर्टाने घेतली आहे. त्यावर हायकोर्टाने ईडीला नोटीस बजावली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच गेल्या १० वर्षापासून ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. राज्यातील विविध कोर्टात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ईडी जाणीवपूर्वक कारवाई करत नाही. शासकीय जमिनी खुलताबाद, लातूरमधील वन विभागाची जमीन, ग्रह खात्याचीही जमीन बेकायदेशीरपणे त्यांनी लाटली आहे हे प्रथमदर्शनी गुन्ह्यात दिसून येते. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली. ईडीने निष्पक्षपणे चौकशी करावी अशी मागणी आम्ही याचिकेत केली आहे असं वकील हिंमतसिंह देशमुख यांनी सांगितले. 

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. ईडी स्वतंत्र तपास यंत्रणा असल्याने त्यात कुठल्याही पक्षाचा उल्लेख करण्यात आला नाही असं वकीलांनी म्हटलं. मागील काही दिवसांपासून देशात ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जात आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीकडून कारवाई होते. परंतु ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात ते भाजपात गेल्यानंतर कारवाई होत नाही. भाजपाकडे भ्रष्टाचारी नेत्यांना स्वच्छ करण्याची धुलाई मशीन आहे असं विरोधक सातत्याने आरोप करत असतात. महाराष्ट्रात सध्या नवाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख यासारखे नेते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे ईडीची दहशत अनेक नेत्यांवर असते त्याच ईडीला आता कोर्टात त्यांचे म्हणणं मांडावं लागणार आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालय