शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:19 IST

गेल्या १० वर्षापासून ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. राज्यातील विविध कोर्टात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ईडी जाणीवपूर्वक कारवाई करत नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

औरंगाबाद - देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ईडी या तपास संस्थेलाच नोटीस बजावण्याचा प्रकार औरंगाबादेत घडला आहे. पुण्याचे MIT चे कराड यांनी संपत्ती लपवल्याचा आरोप त्यांच्याच नातेवाईकांनी तक्रार केली. परंतु ईडी त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

याचिकाकर्त्यांचे वकील हिंमतसिंह देशमुख म्हणाले की, ईडी ही देशाची निष्पक्ष संस्था आहे. ईडीला पुरक असे मनी लॉन्ड्रिंग कायद्यात सर्व अधिकार देण्यात आले आहेत. परंतु पुरावे आणि आवश्यक गोष्टी पुरवूनही ईडीकडून काही ठराविक कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे लातूरचे विनायक श्रीपती कराड यांनी ईडीविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल हायकोर्टाने घेतली आहे. त्यावर हायकोर्टाने ईडीला नोटीस बजावली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच गेल्या १० वर्षापासून ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. राज्यातील विविध कोर्टात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ईडी जाणीवपूर्वक कारवाई करत नाही. शासकीय जमिनी खुलताबाद, लातूरमधील वन विभागाची जमीन, ग्रह खात्याचीही जमीन बेकायदेशीरपणे त्यांनी लाटली आहे हे प्रथमदर्शनी गुन्ह्यात दिसून येते. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली. ईडीने निष्पक्षपणे चौकशी करावी अशी मागणी आम्ही याचिकेत केली आहे असं वकील हिंमतसिंह देशमुख यांनी सांगितले. 

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. ईडी स्वतंत्र तपास यंत्रणा असल्याने त्यात कुठल्याही पक्षाचा उल्लेख करण्यात आला नाही असं वकीलांनी म्हटलं. मागील काही दिवसांपासून देशात ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जात आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीकडून कारवाई होते. परंतु ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात ते भाजपात गेल्यानंतर कारवाई होत नाही. भाजपाकडे भ्रष्टाचारी नेत्यांना स्वच्छ करण्याची धुलाई मशीन आहे असं विरोधक सातत्याने आरोप करत असतात. महाराष्ट्रात सध्या नवाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख यासारखे नेते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे ईडीची दहशत अनेक नेत्यांवर असते त्याच ईडीला आता कोर्टात त्यांचे म्हणणं मांडावं लागणार आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालय