शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

'यामुळे' फडणवीसांना किंमत मोजावी लागली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:12 IST

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे. 

मुंबई - ‘मी पुन्हा येईन’, असे सगळेच म्हणत असतात, त्यात गैर काहीच नाही, मात्र हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. निवडणुकीच्या काळातील त्यांच्या भाषणांमध्ये मी पणाचा दर्प होता, त्याची त्यांना किंमत मोजावी लागली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर त्या पाठिंब्याचा उपयोग आपल्या संघटन वाढीसाठी करून घ्यावा. मात्र त्यात मी पणाचा दर्प असू नये. शेवटच्या प्रचारसभांमधील फडणवीसांच्या भाषणांमधून सत्तेचा दर्प येत होता, असं पवार यांनी सांगितले. 

शरद पवार हे इतिहास जमा झालेलं नाव असून आता माझ नाव आहे. त्यांच्या बोलण्यात सत्तेचा दर्प होता. मी म्हणजे सर्वकाही आणि बाकीचे तुच्छ, अशा प्रकारची भूमिका त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला.  महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही. लोकांना विनम्रता आवडते. ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री झाले.  त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचे वेगळं स्थान नव्हतं. नागपूरचे महापौर असतील, तिथे त्यांच योगदान असेल. विधानसभेत त्यांच योगदान ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. मात्र मी म्हणजे महाराष्ट्र असं समजल्याने त्यांना किंमत मोजावी लागल्याचे पवारांनी नमूद केले. 

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे.