शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

'यामुळे' फडणवीसांना किंमत मोजावी लागली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:12 IST

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे. 

मुंबई - ‘मी पुन्हा येईन’, असे सगळेच म्हणत असतात, त्यात गैर काहीच नाही, मात्र हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. निवडणुकीच्या काळातील त्यांच्या भाषणांमध्ये मी पणाचा दर्प होता, त्याची त्यांना किंमत मोजावी लागली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर त्या पाठिंब्याचा उपयोग आपल्या संघटन वाढीसाठी करून घ्यावा. मात्र त्यात मी पणाचा दर्प असू नये. शेवटच्या प्रचारसभांमधील फडणवीसांच्या भाषणांमधून सत्तेचा दर्प येत होता, असं पवार यांनी सांगितले. 

शरद पवार हे इतिहास जमा झालेलं नाव असून आता माझ नाव आहे. त्यांच्या बोलण्यात सत्तेचा दर्प होता. मी म्हणजे सर्वकाही आणि बाकीचे तुच्छ, अशा प्रकारची भूमिका त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला.  महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही. लोकांना विनम्रता आवडते. ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री झाले.  त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचे वेगळं स्थान नव्हतं. नागपूरचे महापौर असतील, तिथे त्यांच योगदान असेल. विधानसभेत त्यांच योगदान ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. मात्र मी म्हणजे महाराष्ट्र असं समजल्याने त्यांना किंमत मोजावी लागल्याचे पवारांनी नमूद केले. 

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे.