शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

माकडाच्या हातात काकडा दिला की हेच होणार, शेतकरी संघटना नेत्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:25 IST

‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे.

कोल्हापूर : ‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. बुधवारी कोल्हापुरातील कार्यक्रमात ‘सुकाणू समिती सुकलेली आहे’ अशा शब्दांत खोत यांनी खिल्ली उडविली आहे. खोत यांच्या या विधानाबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजूशेट्टी यांनी अतिशय मोजकी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, माणसाची जागा बदलली की तोंडातील भाषाही बदलते. यंदाचा ऊस दर कुठे ठरणार हे भविष्यकाळात खोत यांना समजेल. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘माकडाच्या हातात काकडा दिला की तो काय पराक्रम करतो, अशातला हा खोतांचा प्रकार आहे.’ भाजपाला विनाशकाले विपरित बुद्धी झाल्याने केवळ संघटना फोडण्यासाठी त्यांनी खोतांना जवळ घेतले आहे. पायाखाली काय जळतेय याचे भान न ठेवता खोत बोलत आहेत. त्याची फळे त्यांना भोगावी लागतील.सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले म्हणाले, दर मेळाव्यात ठरू नये हे खरे आहे. मात्र, जर तो ज्यांनी ठरवायचा ते ठरवत नसतील तर मेळावा घेऊन आणि रस्त्यावर उतरूनच तो ठरवावा लागेल. सदाभाऊ खोत यांना याचा अनुभव आहे. सत्तेला शरण जाणाºयांनी संघटनेच्या प्रकृतीबाबत बोलण्याची गरज नाही. शेतक-यांच्या पोरांनी काढलेली ही संघटना सुकलेली आहे की बाळसे धरलेली आहे हे येणाºया कालावधीत घडणाºया रस्त्यांवरच्या आंदोलनातून ठरणार आहे.आज ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चारघुनाथदादा पाटील म्हणाले, शुक्रवारी बलिप्रतिपदा आहे. बळीचा सण आहे. राज्यातील ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चा नेला जाणार आहे.विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणा-या विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात ३०२, ४२० आणि ३०६ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार