शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

माकडाच्या हातात काकडा दिला की हेच होणार, शेतकरी संघटना नेत्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:25 IST

‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे.

कोल्हापूर : ‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. बुधवारी कोल्हापुरातील कार्यक्रमात ‘सुकाणू समिती सुकलेली आहे’ अशा शब्दांत खोत यांनी खिल्ली उडविली आहे. खोत यांच्या या विधानाबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजूशेट्टी यांनी अतिशय मोजकी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, माणसाची जागा बदलली की तोंडातील भाषाही बदलते. यंदाचा ऊस दर कुठे ठरणार हे भविष्यकाळात खोत यांना समजेल. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘माकडाच्या हातात काकडा दिला की तो काय पराक्रम करतो, अशातला हा खोतांचा प्रकार आहे.’ भाजपाला विनाशकाले विपरित बुद्धी झाल्याने केवळ संघटना फोडण्यासाठी त्यांनी खोतांना जवळ घेतले आहे. पायाखाली काय जळतेय याचे भान न ठेवता खोत बोलत आहेत. त्याची फळे त्यांना भोगावी लागतील.सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले म्हणाले, दर मेळाव्यात ठरू नये हे खरे आहे. मात्र, जर तो ज्यांनी ठरवायचा ते ठरवत नसतील तर मेळावा घेऊन आणि रस्त्यावर उतरूनच तो ठरवावा लागेल. सदाभाऊ खोत यांना याचा अनुभव आहे. सत्तेला शरण जाणाºयांनी संघटनेच्या प्रकृतीबाबत बोलण्याची गरज नाही. शेतक-यांच्या पोरांनी काढलेली ही संघटना सुकलेली आहे की बाळसे धरलेली आहे हे येणाºया कालावधीत घडणाºया रस्त्यांवरच्या आंदोलनातून ठरणार आहे.आज ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चारघुनाथदादा पाटील म्हणाले, शुक्रवारी बलिप्रतिपदा आहे. बळीचा सण आहे. राज्यातील ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चा नेला जाणार आहे.विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणा-या विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात ३०२, ४२० आणि ३०६ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार