शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

ठाणे पालिकेला ३९६ कोटी रुपयांचे नुकसान?

By admin | Updated: April 29, 2017 02:55 IST

अंतर्गत लेखापरीक्षणातील आक्षेपांची पूर्तता न केल्याने आर्थिक वर्ष २००७-०८ ते २०१३-१४पर्यंत ठाणे महापालिकेला एकूण ३९६ कोटी

दीप्ती देशमुख / मुंबईअंतर्गत लेखापरीक्षणातील आक्षेपांची पूर्तता न केल्याने आर्थिक वर्ष २००७-०८ ते २०१३-१४पर्यंत ठाणे महापालिकेला एकूण ३९६ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. तर महापालिकेने एवढे आर्थिक नुकसान झाले नसल्याचा उच्च न्यायालयात दावा केला आहे.ठाणे महापालिकेचे लेखापरीक्षण नियमित नसल्याने पालिकेच्या महालेखाकारांना आणि स्थायी समितीला यामध्ये नियमितता आणण्याचे निर्देश द्यावेत. तसेच आतापर्यंत प्रलंबित असलेल्या १४,१०१ महालेखाकारांच्या आक्षेपांची पूर्तता न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका ठाण्याचे समाजसेवक विक्रांत तावडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.याचिकेनुसार, महापालिकेचे लेखापरीक्षण पालिका कायद्यानुसार दर आठवड्याला झाले पाहिजे. त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे मांडला पाहिजे. त्यानुसार स्थायी समिती पुढे कार्यवाही करत असते. मात्र ठाणे महापालिकेचा लेखापरीक्षण अहवाल अनियमित आहे. २०१० - २०११मध्ये महालेखाकारांनी स्थायी समितीपुढे शेवटचा लेखापरीक्षण अहवाल सादर केला. यादरम्यान महालेखाकारांनी अनेक आक्षेप उपस्थित केले. संबंधित विभागांकडून त्यांचे निरसन केले नाही. महालेखाकारांनी ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणूनही समितीनेही कार्यवाही केली नाही.शुक्रवारच्या सुनावणीत तावडे यांच्या वकिलांनी ठाणे महापालिकेने माहितीच्या अधिकाराखाली दिलेली माहिती उच्च न्यायालयापुढे सादर केली. या माहितीनुसार १९८२-८३ ते २०१३-१४ या काळात अंतर्गत लेखापरीक्षणादरम्यान महालेखाकारांनी घेतलेल्या आक्षेपांची संख्या १६,६३१ इतकी आहे. आतापर्यंत १४, १०१ आक्षेप प्रलंबित आहेत. या आक्षेपांची पूर्तता न झाल्याने महापालिकेला २००७-२००८ ते २०१३-१४ या आर्थिक वर्षांत एकूण ३९६ कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती खुद्द पालिकेनेच माहितीच्या अधिकारात याचिकाकर्त्यांना दिली. मात्र महापालिकेच्या वकिलांनी ही बाब फेटाळली आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त संजय निपाणे यांनी खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. यानुसार, महालेखाकारांनी उपस्थित केलेले आक्षेप पालिकेची स्थापना झाल्यापासूनचे आहेत. २०१४-१५ या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल प्रतीक्षेत आहे आणि २०१५ व १६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरू आहे. ‘प्रलंबित आक्षेपांचे निरसन करण्यासाठी जुनी कागदपत्रे शोधण्याचे काम सुरू आहे. महालेखाकारांनी उपस्थित केलेले आक्षेप हे खर्च चुकीच्या मथळ्याखाली लिहिल्यासंबंधी आहेत. तसेच एखाद्या खर्चाची पावती जमा न केल्यास ती बाब ‘आक्षेपा’मध्ये दाखवण्यात येत आहे,’ असे निपाणे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.‘कायद्यानुसार हे अहवाल स्थायी समितीपुढे मांडण्यात आले का? आणि गंभीर आक्षेप उपस्थित करून त्यांची पूर्तता करण्यात आली नसेल तर संबंधितांवर काय कारवाई केली? याची माहिती ३० जूनपर्यंत द्या,’ असे निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले.