शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ठाणे पालिकेला ३९६ कोटी रुपयांचे नुकसान?

By admin | Updated: April 29, 2017 02:55 IST

अंतर्गत लेखापरीक्षणातील आक्षेपांची पूर्तता न केल्याने आर्थिक वर्ष २००७-०८ ते २०१३-१४पर्यंत ठाणे महापालिकेला एकूण ३९६ कोटी

दीप्ती देशमुख / मुंबईअंतर्गत लेखापरीक्षणातील आक्षेपांची पूर्तता न केल्याने आर्थिक वर्ष २००७-०८ ते २०१३-१४पर्यंत ठाणे महापालिकेला एकूण ३९६ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. तर महापालिकेने एवढे आर्थिक नुकसान झाले नसल्याचा उच्च न्यायालयात दावा केला आहे.ठाणे महापालिकेचे लेखापरीक्षण नियमित नसल्याने पालिकेच्या महालेखाकारांना आणि स्थायी समितीला यामध्ये नियमितता आणण्याचे निर्देश द्यावेत. तसेच आतापर्यंत प्रलंबित असलेल्या १४,१०१ महालेखाकारांच्या आक्षेपांची पूर्तता न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका ठाण्याचे समाजसेवक विक्रांत तावडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.याचिकेनुसार, महापालिकेचे लेखापरीक्षण पालिका कायद्यानुसार दर आठवड्याला झाले पाहिजे. त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे मांडला पाहिजे. त्यानुसार स्थायी समिती पुढे कार्यवाही करत असते. मात्र ठाणे महापालिकेचा लेखापरीक्षण अहवाल अनियमित आहे. २०१० - २०११मध्ये महालेखाकारांनी स्थायी समितीपुढे शेवटचा लेखापरीक्षण अहवाल सादर केला. यादरम्यान महालेखाकारांनी अनेक आक्षेप उपस्थित केले. संबंधित विभागांकडून त्यांचे निरसन केले नाही. महालेखाकारांनी ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणूनही समितीनेही कार्यवाही केली नाही.शुक्रवारच्या सुनावणीत तावडे यांच्या वकिलांनी ठाणे महापालिकेने माहितीच्या अधिकाराखाली दिलेली माहिती उच्च न्यायालयापुढे सादर केली. या माहितीनुसार १९८२-८३ ते २०१३-१४ या काळात अंतर्गत लेखापरीक्षणादरम्यान महालेखाकारांनी घेतलेल्या आक्षेपांची संख्या १६,६३१ इतकी आहे. आतापर्यंत १४, १०१ आक्षेप प्रलंबित आहेत. या आक्षेपांची पूर्तता न झाल्याने महापालिकेला २००७-२००८ ते २०१३-१४ या आर्थिक वर्षांत एकूण ३९६ कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती खुद्द पालिकेनेच माहितीच्या अधिकारात याचिकाकर्त्यांना दिली. मात्र महापालिकेच्या वकिलांनी ही बाब फेटाळली आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त संजय निपाणे यांनी खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. यानुसार, महालेखाकारांनी उपस्थित केलेले आक्षेप पालिकेची स्थापना झाल्यापासूनचे आहेत. २०१४-१५ या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल प्रतीक्षेत आहे आणि २०१५ व १६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरू आहे. ‘प्रलंबित आक्षेपांचे निरसन करण्यासाठी जुनी कागदपत्रे शोधण्याचे काम सुरू आहे. महालेखाकारांनी उपस्थित केलेले आक्षेप हे खर्च चुकीच्या मथळ्याखाली लिहिल्यासंबंधी आहेत. तसेच एखाद्या खर्चाची पावती जमा न केल्यास ती बाब ‘आक्षेपा’मध्ये दाखवण्यात येत आहे,’ असे निपाणे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.‘कायद्यानुसार हे अहवाल स्थायी समितीपुढे मांडण्यात आले का? आणि गंभीर आक्षेप उपस्थित करून त्यांची पूर्तता करण्यात आली नसेल तर संबंधितांवर काय कारवाई केली? याची माहिती ३० जूनपर्यंत द्या,’ असे निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले.