शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात पहिला, कल्याण, भिवंडी, शहापूरची कामगिरी सर्वोत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:55 IST

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

ठाणे :  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणात संख्येनुसार घरकुले पूर्ण करणाऱ्या राज्यातील पहिल्या दहा तालुक्यांमध्ये शहापूर तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या कामगिरीची दखल घेऊन घरकुल राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून राज्याचे ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेला गौरविले जाणार आहे. हा गौरव १ सप्टेंबर २०१८ रोजी सिडको भवन सभागृह सीबीडी बेलापूर येथे होणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या  जातात. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ वर्षाकरिता जिल्ह्याला ३ हजार ३९९  लक्षांक दिले होते. त्यापैकी ३  हजार १४६ पूर्ण करण्यात आले. सन २०१७- १८ करिता ७७४ एवढे लक्षांक दिले होते. त्यापैकी ५२१ घरकुल बांधण्यात आली. तर २०१८- १९ करिता ४६२ लक्षांक देण्यात आला असून त्यापैकी ४४३ घरांना मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या वर्षाचा पहिला हप्ता देखील लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून  शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत. सन २०१७-१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Homeघर