शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

थायलंडची चिंच खामगावच्या बाजारात

By admin | Updated: August 22, 2016 22:45 IST

जेथे पिकते तेथे विकत नसते याप्रमाणे तसेच गुणवत्तेसोबतच आकर्षक पॅकिंजच्या जोरावर थायलंडमधील चिंच भारतवासीयांची पसंती ठरत असून चक्क ३२० रुपये किलोप्रमाणे खामगाव

ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. २२ : जेथे पिकते तेथे विकत नसते याप्रमाणे तसेच गुणवत्तेसोबतच आकर्षक पॅकिंजच्या जोरावर थायलंडमधील चिंच भारतवासीयांची पसंती ठरत असून चक्क ३२० रुपये किलोप्रमाणे खामगाव तालुक्याठिकाणी सुध्दा या चिंचेची विक्री वाढली आहे. चिंच ही तोंडाला चव आणणारी तसेच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे विविध आजारामध्ये गुणकारी औषध आहे. तर अक्षय्यतृतीयेला प्रत्येक घरी चिंचवण्यासाठी चिंचेचा वापर होतो. मात्र चिंचेची मागणी असताना सुध्दा चिंचेचे झाड लावण्याकडे दुर्लक्ष शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. पक्ष्यांमार्फत वा चिंच खाल्यानंतर बी पडल्याने झाड उगवले अशीच चिंचेची झाडे परिसरात आढळून येतात.

चिंच हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक असल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. तर कृषी विभागाकडूनही चिंचेच्या सुधारित जाती निर्माण करण्याबाबत उदासिनता दिसून येते. परिणामी आज बाजारात थायलंड येथील चिंचेची विक्री वाढली आहे. या चिंचेचे भाव तब्बल ३२० रुपये किलो असे आहेत. मात्र आकर्षक पँकिंग, न्युट्रिशियन चार्ट असल्याने ही चिंच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. परिणामी आज या विदेशी चिंचेने भारतीय बाजारपेठेत आपली जागा निर्माण केली आहे. खामगाव सारख्या तालुक्याचे ठिकाणी या चिंचेची दररोज किमान १० किलो विक्री होते. एकूणच भारतातही गोड चिंचेचे झाड विकसित केल्यास शेतकऱ्यांना शेतीसोबतच उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होवू शकेल.औषधी गुणधर्मामुळे चिंचेला वाढती मागणीपिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत.पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं. त्यामुळे अनेकांच्या स्वयंपाकघरात नित्य वापरण्यासाठी हमखास चिंच असते. यामुळे चिंचेची मागणी मोठ्या प्रमाणात असते.शेतकऱ्यांना होवू शकते उत्पन्नाचे साधनचिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनविला जातो. वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध म्हणून वापरात येते. अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच, त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी, आंबटगोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधमार्मुळे एक औषध म्हणूनही उपयुक्त आहे. त्यामुळे भारतात चिंचेला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर चिंचेचे झाड लावल्यास पर्यावरण रक्षणासोबतच शेतकऱ्यांना चांगले उत्पादनाचे साधन होवू शकते.