शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

ठाकरे इच्छापत्र वाद : पिता-पुत्राच्या संबंधांचे दाखले पत्रकार देणार का? उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरेंना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:21 IST

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होईपर्यंत त्यांचे आणि आपले संबंध चांगले होते, हे सिद्ध करण्यासाठी जयदेव ठाकरे यांच्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन पत्रकारांशी साक्ष नोंदविली.

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होईपर्यंत त्यांचे आणि आपले संबंध चांगले होते, हे सिद्ध करण्यासाठी जयदेव ठाकरे यांच्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन पत्रकारांशी साक्ष नोंदविली. मात्र आणखी काही पत्रकारांना साक्षसाठी बोलविण्याची विनंती न्यायालयाने अमान्य केली व पिता-पुत्राचे संबंध चांगले होते, यावर पत्रकार शिक्कामोर्तब करणार का? असा सवाल केला.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी व त्यांच्यातील आणि जयदेव यांच्यातील संबंधांविषयी २००९ व २०१२ मध्ये वर्तमानपत्रात अनेक वृत्ते प्रसिद्ध झाली होती. त्यावरून जयदेव यांनी संबंधित वृत्त लिहिणाºया काही पत्रकारांना न्यायालयात साक्षीदार म्हणून बोलाविले. त्यातील तिघे मंगळवारी न्यायालयात उपस्थित होते. मात्र, आणखी एका पत्रकाराची साक्ष नोंदवावी, असा आग्रह जयदेव यांच्या वकिलांनी न्या. गौतम पटेल यांना केला. मात्र, न्यायालयाने त्याला नकार दिला.शिवसेना म्हणून अनेक पत्रकारांनी तुमच्यातील अनेकांची मुलाखत घेतली असेल. प्रत्येकाला साक्ष देण्यासाठी बोलावणार का? वडील-मुलगा यांच्या चांगल्या संबंधावर पत्रकार शिक्कामोर्तब करणार का? असा सवाल न्या. पटेल यांनी जयदेव यांच्या वकिलांना केला.तुम्ही न्यायालयात आला आहात, त्यामुळे तुम्हीच पुरावे द्या. अनेक साक्षीदार बोलावून हा खटला पुढील २५ वर्षे चालविणार आहात का? २०१४ पासून हा दावा प्रलंबित आहे. त्यामुळे आणखी विलंब होता कामा नये. न्यायालयास उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत (४ मे) सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून झाल्याच पाहिजेत. त्यानंतर, अंतिम युक्तिवादाला सुरुवात करू , असे म्हणत, न्यायालयाने या दाव्यावरील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी ठेवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १३ डिसेंबर २०११ रोजी केलेल्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या इच्छापत्रात बाळासाहेबांनी त्यांची बहुतांश संपत्ती उद्धव ठाकरे यांच्या नावे केली आहे, तर त्यांचा नातू ऐश्वर्य याच्या नावावर ‘मातोश्री’चा पहिला माळा केला आहे. बाळासाहेबांनी या इच्छापत्रात जयदेव यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्याने, जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला.पत्रकारांना प्रवासभत्ताएका वर्तमानपत्राचे संपादक, पत्रकार आणि छायाचित्रकाराची न्यायालयाने साक्ष नोंदविली. साक्षीसाठी आलेल्या पत्रकारांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये, तर संपादकांना दिल्लीवरून साक्षीसाठी आल्याबद्दल विमानाचे प्रवासभाडे देण्याचे निर्देश जयदेव यांना दिले.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेHigh Courtउच्च न्यायालय