शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 06:58 IST

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

सावंतवाडी/मुंबई : आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचे राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरे मैदान आम्ही घेतले आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो हे आता जनतेने ओळखावे, असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाने पालिकेला अजून कळविले नसल्याने शिवाजी पार्क कोणत्या शिवसेनेला द्यायचे याबाबत अजूनही पालिका प्रशासन संभ्रमात आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली असता दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. याच मुद्द्यावर आज, मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेणार आहेत.

शिवसेनाएकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केले होते. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याचे टाळले. पहिला अर्ज कोणाचा आला त्याबाबत दोन्ही गटांनी गुप्तता पाळली आहे. 

दुसरे मैदान घेतल्याचा दावाकाय आहे नियम?- शिवाजी पार्क वर्षातील ३६५ दिवसांपैकी ४५ दिवस राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देता येते. यापैकी ९ दिवस शिवाजी पार्क कोणाला द्यायचे, याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. - उरलेले ३६ दिवस मैदान कोणाला द्यायचे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार पालिकेला आहे. दसरा मेळाव्यासाठी कोणताही राजकीय पक्ष अथवा संस्था अर्ज करू शकते.- मात्र, पालिकेच्या निकषानुसार मैदानासाठी जी संस्था अथवा राजकीय पक्ष प्रथम अर्ज करते, त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येते. अर्ज करणाऱ्याचा मागील काही वर्षांचा इतिहास तपासला जातो. - मागील वर्षी जर एखाद्या संस्थेला अथवा राजकीय पक्षाला मैदान दिले असेल, तर यावर्षी ते मैदान प्राधान्याने त्या संस्थेला मिळू शकते.

शिवाजी पार्क कुणाला द्यायचे यावरून गेल्यावर्षी राजकीय दबावाखाली पालिकेने टाळाटाळ केल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. अखेर न्यायालयाने प्रशासकीय चूक लक्षात आणून दिल्यानंतर ठाकरे गटाला मैदान मिळाले होते. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण